मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Wednesday 6 August 2014

विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,

विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा'
मध्ये म्हणतो,
"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते.
एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता.
मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच.
ती चंद्राची सखी असते.
मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो,
तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत
होते.
मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू
तो वाऱ्याशी गुजगोष्टी करीत असतो.
अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते;
धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते.
" पुढे तो म्हणतो,"वाऱ्याचाही शिरकाव होणार
नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात.
किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे
मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो.
या लष्कराने आणि शिवाजीने
आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून
काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले
आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला.
त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत
राहिले."

No comments:

Post a Comment