गड बघायला गेलो पण गड कुठे दिसलाच नाही असे म्हणणार्यांनी हा माझा अनुभव नक्की वाचवा.
माझ्या जवळ दोन तासांचा वेळ होता अजिंक्यातार्यासाठी. घोड्याला टाच मारावी तशी मी गाडीला किक मारली आणि खेकळत निघालेली घोडी किल्ल्याच्या दिशेने उधळली. गाडीचा वेग वाढतहोता तशी मनगटातली रग आणि छातीतली धगही वाढू लागली होती.रानटी जनावरासारखा मी वळणांचारस्ता कापीत होतो.
मी माझ्याच जोशात असताना माझ्या दोन्ही बाजूनी गारांचापाऊस पडावा तसा टापांचा खडखडाट उसळला.....हिरवे झगे फरफरू लागले......धिन धिन च्या किल्कार्या घुमू लागल्या ........ मोघली सैतानी तोफा आ वासून आग ऒकु लागल्या.... धुराचे लोट उतू लागले.......... .. नंग्या तलवारी गडाच्या दिशेने उगरु लागल्या.......
राजा नही रहा अब इनका मिट्टी मे मिला दो काफिरोन्को ..........
दुसर्याच क्षणी हरहर महादेव ची आरोळी आसमंतात उठली....... ढगांचा प्रचंड गडगडाट माजावा तशा काळ्या फत्तरी , शिळा कडेकपारीतून झेपावू लागल्या. झाडे वेली चिरडीत अन टप्प्यात भेटेल तो गनीम जमीनदोस्त करीत पायथ्याला जावून विसावल्या.
सुलतान धावा गडाला भिडला अन शिड्या अन दोर ताटाला खेटु लागले.तसा मुख्य दरवाजाच्या माथ्यावरून ढाण्या वाघ चवताळून उठावा तसा एक नरवीर समशेर उपसत कडाडला.
हर हर महादेव......... .. मराठ्यानो जिता सोडायचा न्हाय गनीम! कोण होता तो जन्ग्बाझ ? ते होते किल्लेदार प्रायागजी प्रभू!
हुकुम सुटू लागले . शिड्या उलटावा ...दोर कापा ....भाजून काढातेलान ......दरवाजे ढील पडू दिवू नका.
कणभर मराठ्यांनी संपूर्ण जिद्द पणाला लावली होती आणि मनभर गनिमानी आपली संपूर्ण ताकत !
मोग्लांनि किल्ल्याच्या तटा खली दोन भुयारे खणली आणि त्यातसुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि धुराचा, आगीचा अन दगड मातीचा लोळ उंच उडाला. अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण ज्वालामुखी उसळावा तसे प्रयागाजी मातीच्या ढिगार्यातून वर निघाले.आणि माझ्या मुखातून आपोआपच शब्द फुटले हर हर महादेव......
दऱ्याखोर्यातून तोच आवाज फिरून माझ्या कानावर पडला आणि मी शुद्धीवर आलो आणि माझ्या लक्षात आले कि मी गडाच्या उंच दरवाजावर उभा होतो आणि खाली दिसत होती खोल दरी.ते मावले,तो गनीम, ते प्रायागजी हवेत विरूनगेले होते.लोहाराच्या भात्यासारखी माझी छाती धपधपत होती,डोळ्यात अंगार फुलाला होता, अंगावर काटा उभा राहिला होता आणि बोचरी हवा अंगाशी झोबत होती. आसपासचे लोक मला वेड लागल्यासारखे माझ्याकडे बघत होते.
मी खाली उतरलो आणि दोन पावलं चालतो तोच ती रणधुमाळी पुन्हा माझ्या आसपास पुन्हा फुलली. तटफुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले. आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले.मराठ्यांच् या तलवारी गनीमाच्या छातीचा वेध घेवू लागल्या बघता बघता रक्ताचा आणि माणसाचा चिखल तुडवीत मराठे पुन्हा सज्ज झाले.
समोरच्या पठारावरून एक भरधाव घोडा उधळत आला आणि एक रनमर्दानी वीज कडकडावी तशी चमकली. पाठीवरच्या भात्यातून एक बाण धनुष्याला लावीत तटाकडे निघून गेली.त्या होत्या महाराणी ताराबाई.......मुख्य दरवाज्याच्या पायर्या चढत एक राजबिंड्या थाटातली एक मूर्ती वर चढत होती
मराठ्यांचे राजकुमार शंभूराजे!
माझी मान झुकली आणि मी मुजर्याला कमरेत शुकलो.शंभूराजे राजवाड्याच्या दिशेने निघाले होते आणि मी हि त्यांच्या पाठोपाठ राजवाड्यात पोहोचलो. शंबूराजांच्या चाहुलीने निद्रिस्त असलेले आबासाहेब उठले आणि समोर राजकुमार बघून चेहेर्यावरचे तेज आणखी दाट झाले.राजांनी शंभूराजांना अलीगन दिले,पितापुत्रा ची भेट झाली,माझ्या डोळ्याच्या कडा ऒलावल्या. मी अश्रू टिपे पर्यंत दोन्ही मुर्त्या पुन्हा विलीन झाल्या.
मी राजवाड्यातून बाहेर आलो पाण्याची टाके, धान्याची कोठारे, तुपाच्या विहिरी, घोड्याच्या पगा, मुकपाद्खाना जश्या च्या तश्या माझ्या सोर उभ्या ठाकल्या होत्या.एके काळी राजवैभव अनुभवलेली हि स्वराज्याची राजधानी जरी आज भग्न अवस्थेत असली तरी मला ती आजही सुस्थितीत दिसत होती.
मी अजिंक्यतारा कधीच विसरू शकत नाही कारण दिवास्वप्ना का होईना पण त्या निमित्ताने मला एक अदभुत अनुभव मिळाला होता.
--------भाऊ मराठा.