मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Tuesday, 16 July 2013

गर सिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी

देवल गिराविते फिराविते निसान अली, ऐसे डूबे रावराने सबी गए लबकी,
गौर गणपती आप औरनको देत ताप, आपनी ही बार सब मारी गये दबकी ,
पीरा पैगंबर दिखाई देत, सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की,
कासी की कला गई मथुरा मस्जिद भई, गर सिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी

अर्थ – यवनांनी मंदिरे पाडून त्या जागी त्यांचा ध्वज फडकविला तेव्हा राव – राणे (राजे महाराजे) भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते, इतके ते निर्बल व निस्तेज झाले, थोडेसे पुजा विधान चुकले तर भक्तांनाच ताप देणा-या देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून लपून बसण्याची वेळ आली. जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून ‘रबची’ चर्चा सुरू झाली, काशी कळाहीन झाली, मथुरेला मशीद उभी राहीली, अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर सर्व हिन्दुंची सुन्ता झाली असती.

No comments:

Post a Comment