मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Wednesday, 6 March 2013

औरंगजेबाने सर्व पैसा ओतला. लाखो माणसे खर्च केली. हजारो दिवस महाराष्ट्रात घालवले. तरी पण शेवटपर्यँत अजिँक्यच

वर्षभराच्या आत संभाजीराजांना लीलया पराभूत करण्याच्या इराद्याने राजधानीपासून महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाला तब्बल 27 वर्षे महाराष्ट्रात संघर्ष करावा लागला. शेवटी येथेच त्याचा 1707 मध्ये अंत झाला. सतत 27 वर्षे राजधानीबाहेर असणारा औरंगजेब जगातील एकमेव राजा आहे. म्हणजे सभाजीराजांचा पराक्रम, धैर्य, नियोजन किती महान होते याची प्रचिती येते.
संभाजीराजांना पराभुत करण्यासाठी औरंगजेबाने सर्व पैसा ओतला. लाखो माणसे खर्च केली. हजारो दिवस महाराष्ट्रात घालवले.पण संभाजीराजे शेवटपर्यँत अजिँक्यच राहिले. त्यांच्यावर आलेले संकट जगाच्या इतिहासात आजपर्यँत कोणावरही आलेले नव्हते.अशा सर्व संकटांवर संभाजीराजांनी मात केली.
महापराक्रमी बुधभुषणकार छत्रपतीसंभाजी राजेँना मानाचा मुजरा !!

No comments:

Post a Comment