जिवंतपणी मृत्यूचा अनुभव घेणारे संभाजीराजे :
मजल - दरमजल करत शिवाजीराजे राजगडावर आले. माँसाहेबांना आनंदझाला. बाळराजांची विचारपूस केली तेव्हा शिवराय अंत्यत शोकाकूल होऊन म्हणाले, "प्रवासाच्या त्रासाने शंभूबाळाचे वाटेतच निधन झाले !" राजांच्या या उदगाराने गडावर एकच रडारड सुरु झाली. संभाजीराजांच्या महाराणी येसुराणी साहेब यांनी कपाळावरचे कंकू पुसले.त्यांच्या निधनाची बातमी महाराष्ट्रासह संपुर्ण देशात पसरली.अनेक स्नेहांकित व नातेवाईक राजांना भेटण्यासाठी राजगडावर आले. संभाजीराजेँच्या तपासाची मोहीम मघारी बोलावली.
मथुरेत असणा-या बाळराजांनादेखील त्यांच्या कथित निधनाची वार्ता समजली.आपल्या जिवंतपणासाठीच निधनाची अफवा आपल्या वडिलांनी पसरवलेली आहे याची कल्पना संभाजीराजांना आली. संभाजीराजांना जिवंतपणीच मृत्यूचा अनुभव घ्यावा लागला स्वराज्यासाठी वयाच्या नवव्या वर्षी असा कटू अनुभव घेणारे संभाजीराजे हे जगातील एकमेव राजपुत्र आहेत.
शोकाकूल परिवार शांत झाल्यावर शिवरायांनी संभाजीराजांना आणण्यासाठी निवडक सैन्य मथुरेला पाठवले. वाटेत अनेक जीवघेण्या प्रसंगाला तोंड देत संभाजीराजे सैनिकांसोबत राजगडावर आले. संभाजीराजे राजगडावर आल्याबरोबरसर्वाँना आश्चर्याचा धक्का बसला."संभाजीराजे जिवंत आहेत आणि ते रायगडावर आलेले आहेत." ही वार्ता वेगाने संपुर्ण भारतात पसरली.संभाजीराज ांच्या सुरक्षिततेसाठी ते जिवंत असताना त्याच्या मृत्यूची बातमी पसरवणारे शिवराय विज्ञाननिष्ट तर होतेच, पण हे गुपित फक्त स्वत : पुरतेच मर्यादित ठेवणारे शिवराय मोठ्या मनाचे निश्चयी महापुरुष होते.
राजगडावर आल्यावर जिजाऊमाँसाहेबां नी नऊ वर्षाच्या बाळराजांना मांडिवर घेतले.बालवयात दिल्लीच्या सम्राटाला जिँकणा-या बाळराजांचा सर्वाँना अभिमान वाटला.कपाळावर कुंकू नसणा-या महाराणी येसुबाई पाहिल्यानंतर त्यांना काय वाटले असेल ? जिवंत पती पाहिल्याबरोबर येसुराणीँना काय वाटले असेल ? शिवरायांच्या परिवाराला हा त्रास कशासाठी तर भूमिपुत्रांच्या स्वराज्यासाठी! वैधव्य हे कधीही अपशकुन व निरुपयोगी नसते, हे शिवरायांनी दाखवून दिले.
मजल - दरमजल करत शिवाजीराजे राजगडावर आले. माँसाहेबांना आनंदझाला. बाळराजांची विचारपूस केली तेव्हा शिवराय अंत्यत शोकाकूल होऊन म्हणाले, "प्रवासाच्या त्रासाने शंभूबाळाचे वाटेतच निधन झाले !" राजांच्या या उदगाराने गडावर एकच रडारड सुरु झाली. संभाजीराजांच्या महाराणी येसुराणी साहेब यांनी कपाळावरचे कंकू पुसले.त्यांच्या निधनाची बातमी महाराष्ट्रासह संपुर्ण देशात पसरली.अनेक स्नेहांकित व नातेवाईक राजांना भेटण्यासाठी राजगडावर आले. संभाजीराजेँच्या तपासाची मोहीम मघारी बोलावली.
मथुरेत असणा-या बाळराजांनादेखील त्यांच्या कथित निधनाची वार्ता समजली.आपल्या जिवंतपणासाठीच निधनाची अफवा आपल्या वडिलांनी पसरवलेली आहे याची कल्पना संभाजीराजांना आली. संभाजीराजांना जिवंतपणीच मृत्यूचा अनुभव घ्यावा लागला स्वराज्यासाठी वयाच्या नवव्या वर्षी असा कटू अनुभव घेणारे संभाजीराजे हे जगातील एकमेव राजपुत्र आहेत.
शोकाकूल परिवार शांत झाल्यावर शिवरायांनी संभाजीराजांना आणण्यासाठी निवडक सैन्य मथुरेला पाठवले. वाटेत अनेक जीवघेण्या प्रसंगाला तोंड देत संभाजीराजे सैनिकांसोबत राजगडावर आले. संभाजीराजे राजगडावर आल्याबरोबरसर्वाँना आश्चर्याचा धक्का बसला."संभाजीराजे जिवंत आहेत आणि ते रायगडावर आलेले आहेत." ही वार्ता वेगाने संपुर्ण भारतात पसरली.संभाजीराज ांच्या सुरक्षिततेसाठी ते जिवंत असताना त्याच्या मृत्यूची बातमी पसरवणारे शिवराय विज्ञाननिष्ट तर होतेच, पण हे गुपित फक्त स्वत : पुरतेच मर्यादित ठेवणारे शिवराय मोठ्या मनाचे निश्चयी महापुरुष होते.
राजगडावर आल्यावर जिजाऊमाँसाहेबां नी नऊ वर्षाच्या बाळराजांना मांडिवर घेतले.बालवयात दिल्लीच्या सम्राटाला जिँकणा-या बाळराजांचा सर्वाँना अभिमान वाटला.कपाळावर कुंकू नसणा-या महाराणी येसुबाई पाहिल्यानंतर त्यांना काय वाटले असेल ? जिवंत पती पाहिल्याबरोबर येसुराणीँना काय वाटले असेल ? शिवरायांच्या परिवाराला हा त्रास कशासाठी तर भूमिपुत्रांच्या स्वराज्यासाठी! वैधव्य हे कधीही अपशकुन व निरुपयोगी नसते, हे शिवरायांनी दाखवून दिले.
No comments:
Post a Comment