मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Wednesday, 6 March 2013

लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे....

लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे .....
आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी महाराज जगले पाहिजेत, अस वाटायला लगाव अशी किमया शिवाजी महाराज करू शकले. इतर राजांना ते शक्य नव्हते. इतर राजांसाठी लढणारे होते, पण त्याचं लढण हे मर्दुमकी गाजवून जहागिरी अन इनाम मिळवण्यासाठी होत, उदात्त कार्यासाठी नव्हे.
शिवकार्यात लढवय्ये सैनिके तर सहभागी होतेच परंतु सर्वसामान्य रयतसुद्धा आपल्या परीने सहभागी होती आणि हे फार महत्वाच होत. राजाच्या कार्यात जेव्हा रायत मनापासून सहभागी असते तेव्हा ते कार्य यशस्वी होत.
खर म्हणजे ते कार्य राजाच नसत तर सर्व रयतेच असत आणि म्हणूनच ते यशस्वी होत.
- साभार : शिवाजी कोण होता ? (गोविंद पानसरे)

No comments:

Post a Comment