त्या वेळी शिवाजी महाराज छत्रपतीझालेले नव्हते. ते सार्वभौम राजे नव्हते. तसे ते जहागिरदारच होते. पण कुणाचीही सत्ता चालवून घेत नव्हते. आदिलशाही, कुतुबशाही, मोगल इ. सारे त्यांना वठणीवर आणायला टपले होते. एका सरदाराचा बंडखोर मुलगा एवढीच त्यांची प्रतिमा होती. पण कुणालाच आवरेनासा झालेला हा बंडखोर.
उभा महाराष्ट्र त्यांच्या पराक्रमाने दिड:मुढ झाला होता. एका नवविवाहीत तरूणीवर अत्याचार करणार्या रांझ्याच्या गुजर पाटलाचे हातपाय याच शिवबांनी तोडले होते. तोरणा, सिंहगड इत्यादी अनेक किल्ले त्यांनी स्वराज्यात आणले होते. रायरीच्याचंद्रराव मोरेचा बिमोड याच शिवरायांनी केला. कल्याण- भिवंडी ते रायरीपर्यंतचा मुलूख यांनीच काबीज केला होता. यामुळे महाराष्ट्रात शिवरायांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता.
इकडे मे १६५७ मध्ये पुरंदर गडावर सईबाईना प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. त्यांना या पूर्वी तीन मुलीच झाल्या होत्या. सखुबाई , राणूबाई, अंबिकाबाई ; या खेपेला पुत्र व्हावा ही सर्वांचीकामना होती. सारा शिवपरिवार पुत्र व्हावा यासाठी आसुसलेला होता. सार्यांची प्रार्थना जणू त्या आई जगदंबेने ऐकली. आणि १४ मे १६५७, शालिवाहन शक १५७९ , ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पुरंदरावर पुत्रजन्माची गोड वार्ता पसरली. भोसल्यांच्या वंशवेलीला अंकूर फुटला. नातवाला पाहून जिजाऊ माँसाहेब अत्यंत आनंदीत झाल्या. नातू म्हणजे दुधावरची साय- नाजूक प्रकृतीच्या सईबाई साहेब बाळंतपणातून सुखरूप बाहेर पडल्या. गोरेपान, गुटगुटीत , अत्यंत लोभस, तेजस्वी डोळे, भरपूर जावळ असे ते वजनदार बाळ सार्या पुरंदरचा जीव की प्राण बनले.
सारी कामे बाजूला ठेवून शिवाजीराजे पुत्राचे मुख पाहण्यासाठी पुरंदरकडे झेपावले. श्री शिवशंभूची कृपा म्हणून बाळाचे नाव शंभुराजे अर्थात संभाजी असे ठेवण्यात आले. कदाचित जिजाऊ माँसाहेबांच्या दिवंगत ज्येष्ठ पुत्राची स्मृती म्हणूनही हे नाव ठेवण्यात आले असेल!
प्रभु श्री रामांना तीन माता होत्या. शंभुबाळासही अनेक माता लाभल्या. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई इ. या सर्वजणी शंभुबाळाचे खूपच लाड करीत. त्यांची सख्खी आई कोणती हे ओळखणं हे कठीण जाई.
सईबाईसाहेब प्रकृतीने अगदीच नाजूक होत्या. बाळ मात्र भलताच दणदणीत. आईकडून बाळाचे पोट भरेना. बाळासाठी दाई ठेवणे आवश्यक होते. दूधआई मिळवण्यासाठी शोध सुरू झाला. नसरापूर जवळील कापूरहोळ गावच्या गाडे पाटलाची पत्नी धाराई ही सुद्घा नुकतीच प्रसूत झालेली होती. आऊसाहेबांनी धाराईला आवतन धाडले व धाराई लगबगीनं आपल्या बाळासह पुरंदरला आली. धाराईच शंभुबाळाची दूधआई झाली. महाराजांनी २६ होनांचे वार्षिक मानधन तिला दिले.
शंभुबाळ वर्षाचे झाले तेव्हा स्वराज्यात चाळीस किल्ल्यांवर महाराजांची सत्ता होती. महाराजांनी औरंगजेबाचे प्रदेश जिंकणे, घोडे, खजिना, शस्त्रास्त्रे, रसद लुटणे इ. प्रकार दणक्यात चालविले होते. विजापूरकरांना त्यांनी पुरते पजवले होते.
विजापूरकरांनी शिवरायांना कायमचे नष्ट करण्यासाठी अफझलखानाला पाठविला . पण महाराजांनी ११ नोव्हेंबर १६५९ लात्याचा वध केला. अफझलखानासारख्या मातब्बर सरदाराची वाताहात झाल्याने सर्वच शाह्यांनी धास्तीच घेतली. त्या वेळी शंभुराजे केवळ अडीच वर्षाचे होते. पण या भिमपराक्रमाने उभा महाराष्ट्र हादरलेला त्यांनी पाहिला होता.
दुर्देवाने यापूर्वीच फक्त २ महिने म्हणजे ५ सप्टेंबर १६५९ ला शंभुबाळाच्या आई सईबाईसाहेब देवाघरी गेल्या होत्या. यानंतर प्रतापगड, पन्हाळा, विशाळगड करीत काही महिन्यांनी शंभुराजे आणि माँसाहेब यांना घेऊन महाराज आता राजगडास आले होते.
शंभुबाळ आपल्या बालपणात महाराजांच्या पराक्रमाच्या अनेकगोष्टी ऐकत होते. अफझलखानाचा वध, सूरतेची लूट, सिद्दी जोहरच्या वेढ्यातून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे तोडली इ. सार्या गोष्टी ऐकताना शंभुराजेंच्या अंगावर चेव चढत असे. त्यांचे शरीर अत्यंत डौलदार होते. मल्लखांब, जोर, बैठका, सुर्यनमस्कार इत्यादी व्यायामप्रकार सुरू होतेच. भालाफेक, दांडपट्टा, घोडेस्वारी इ. शिक्षण चालूच होते. असे म्हणतातकी, त्या काळी पळत्या घोड्याला एका पायावर उभे करुन डोळ्याची पापण्या लवतो न लवतो तोच गर्रदिशी फिरवणारा जगाच्या पाठीवर एकच योद्धा होऊन गेला, तो म्हणजे 'संभाजी'.
उमाजी पंडित आणि केशव पंडित संस्कृत भाषा, साहित्य, काव्य, रामायण, महाभारताचे बाळकडू देत होते. दिसामासांनी शंभुराजे ८ वर्षांचे झाले.
संदर्भ- प्रा. सु. ग. शेवडे लिखित 'शंभुराजे'
उभा महाराष्ट्र त्यांच्या पराक्रमाने दिड:मुढ झाला होता. एका नवविवाहीत तरूणीवर अत्याचार करणार्या रांझ्याच्या गुजर पाटलाचे हातपाय याच शिवबांनी तोडले होते. तोरणा, सिंहगड इत्यादी अनेक किल्ले त्यांनी स्वराज्यात आणले होते. रायरीच्याचंद्रराव मोरेचा बिमोड याच शिवरायांनी केला. कल्याण- भिवंडी ते रायरीपर्यंतचा मुलूख यांनीच काबीज केला होता. यामुळे महाराष्ट्रात शिवरायांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता.
इकडे मे १६५७ मध्ये पुरंदर गडावर सईबाईना प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. त्यांना या पूर्वी तीन मुलीच झाल्या होत्या. सखुबाई , राणूबाई, अंबिकाबाई ; या खेपेला पुत्र व्हावा ही सर्वांचीकामना होती. सारा शिवपरिवार पुत्र व्हावा यासाठी आसुसलेला होता. सार्यांची प्रार्थना जणू त्या आई जगदंबेने ऐकली. आणि १४ मे १६५७, शालिवाहन शक १५७९ , ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पुरंदरावर पुत्रजन्माची गोड वार्ता पसरली. भोसल्यांच्या वंशवेलीला अंकूर फुटला. नातवाला पाहून जिजाऊ माँसाहेब अत्यंत आनंदीत झाल्या. नातू म्हणजे दुधावरची साय- नाजूक प्रकृतीच्या सईबाई साहेब बाळंतपणातून सुखरूप बाहेर पडल्या. गोरेपान, गुटगुटीत , अत्यंत लोभस, तेजस्वी डोळे, भरपूर जावळ असे ते वजनदार बाळ सार्या पुरंदरचा जीव की प्राण बनले.
सारी कामे बाजूला ठेवून शिवाजीराजे पुत्राचे मुख पाहण्यासाठी पुरंदरकडे झेपावले. श्री शिवशंभूची कृपा म्हणून बाळाचे नाव शंभुराजे अर्थात संभाजी असे ठेवण्यात आले. कदाचित जिजाऊ माँसाहेबांच्या दिवंगत ज्येष्ठ पुत्राची स्मृती म्हणूनही हे नाव ठेवण्यात आले असेल!
प्रभु श्री रामांना तीन माता होत्या. शंभुबाळासही अनेक माता लाभल्या. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई इ. या सर्वजणी शंभुबाळाचे खूपच लाड करीत. त्यांची सख्खी आई कोणती हे ओळखणं हे कठीण जाई.
सईबाईसाहेब प्रकृतीने अगदीच नाजूक होत्या. बाळ मात्र भलताच दणदणीत. आईकडून बाळाचे पोट भरेना. बाळासाठी दाई ठेवणे आवश्यक होते. दूधआई मिळवण्यासाठी शोध सुरू झाला. नसरापूर जवळील कापूरहोळ गावच्या गाडे पाटलाची पत्नी धाराई ही सुद्घा नुकतीच प्रसूत झालेली होती. आऊसाहेबांनी धाराईला आवतन धाडले व धाराई लगबगीनं आपल्या बाळासह पुरंदरला आली. धाराईच शंभुबाळाची दूधआई झाली. महाराजांनी २६ होनांचे वार्षिक मानधन तिला दिले.
शंभुबाळ वर्षाचे झाले तेव्हा स्वराज्यात चाळीस किल्ल्यांवर महाराजांची सत्ता होती. महाराजांनी औरंगजेबाचे प्रदेश जिंकणे, घोडे, खजिना, शस्त्रास्त्रे, रसद लुटणे इ. प्रकार दणक्यात चालविले होते. विजापूरकरांना त्यांनी पुरते पजवले होते.
विजापूरकरांनी शिवरायांना कायमचे नष्ट करण्यासाठी अफझलखानाला पाठविला . पण महाराजांनी ११ नोव्हेंबर १६५९ लात्याचा वध केला. अफझलखानासारख्या मातब्बर सरदाराची वाताहात झाल्याने सर्वच शाह्यांनी धास्तीच घेतली. त्या वेळी शंभुराजे केवळ अडीच वर्षाचे होते. पण या भिमपराक्रमाने उभा महाराष्ट्र हादरलेला त्यांनी पाहिला होता.
दुर्देवाने यापूर्वीच फक्त २ महिने म्हणजे ५ सप्टेंबर १६५९ ला शंभुबाळाच्या आई सईबाईसाहेब देवाघरी गेल्या होत्या. यानंतर प्रतापगड, पन्हाळा, विशाळगड करीत काही महिन्यांनी शंभुराजे आणि माँसाहेब यांना घेऊन महाराज आता राजगडास आले होते.
शंभुबाळ आपल्या बालपणात महाराजांच्या पराक्रमाच्या अनेकगोष्टी ऐकत होते. अफझलखानाचा वध, सूरतेची लूट, सिद्दी जोहरच्या वेढ्यातून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे तोडली इ. सार्या गोष्टी ऐकताना शंभुराजेंच्या अंगावर चेव चढत असे. त्यांचे शरीर अत्यंत डौलदार होते. मल्लखांब, जोर, बैठका, सुर्यनमस्कार इत्यादी व्यायामप्रकार सुरू होतेच. भालाफेक, दांडपट्टा, घोडेस्वारी इ. शिक्षण चालूच होते. असे म्हणतातकी, त्या काळी पळत्या घोड्याला एका पायावर उभे करुन डोळ्याची पापण्या लवतो न लवतो तोच गर्रदिशी फिरवणारा जगाच्या पाठीवर एकच योद्धा होऊन गेला, तो म्हणजे 'संभाजी'.
उमाजी पंडित आणि केशव पंडित संस्कृत भाषा, साहित्य, काव्य, रामायण, महाभारताचे बाळकडू देत होते. दिसामासांनी शंभुराजे ८ वर्षांचे झाले.
संदर्भ- प्रा. सु. ग. शेवडे लिखित 'शंभुराजे'
No comments:
Post a Comment