३५० वर्षापूर्वी सर्व भारताच्याकैफियती ऐकणाऱ्या माझ्यासारख्याला आज स्वतःची कैफियत तुमच्या समोर मांडावी लागती आहे , याहून मोठे माझ्या आयुष्यातील दुर्दैव ते कोणते ? कारण की , तुमच्या सारखा मी माझ्या परिवाराच्या भविष्याचा विचार न करता तळागाळातील रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्याची स्थापना केली , ती तुमची पोरे - बाळे आणि तुमचा परिवार सुखी रहावा म्हणून , पण आजमी रक्ताचे पाणी करून स्थापना केलेल्या स्वराज्यातील गड - किल्ल्यांची काय अवस्था आहे ? आणि माझे नाव लावून स्वतःची पोटेभरणाऱ्या भारत सरकारच्या पर्यटनखात्याकडून आणि सांगायलाही लाज वाटावी अशा माझ्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन खात्याकडून भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे निधी देऊन सुशोभित केली जात आहेत ! मग मी स्वराज्याची सुरुवात केलेल्या , माझ्याच बारा मावळामधील , आणि सर्व महाराष्ट्रातील मी स्वतः उभे केलेल्या किल्ल्यांची आजची अवस्था तुम्हाला ए.सी कार्यालयात बसून कळणार आहे का रे? एरव्ही आक्रमक भाषणे करणाऱ्यां तुमच्या पैकी किती जण माझ्या गड - किल्ल्यांवर स्वतः पायी चालत जाऊन आलेत रे ? माझे नाव घेवुन जगणाऱ्या तुम्हाला , माझा एवढ्या लवकर विसर पडला का रे ? भविष्यात पण तुम्ही आज जन्माला आलेले सर्व पक्ष हे सर्वविश्व उभे करणारया माझ्यासारख्याला असे तुमचे नाकर्तेपण दाखवणार असाल तर माझ्या सर्व सामान्य रयतेला तुम्ही काय न्याय देणार आहात ? लक्षात ठेवा जो कोणी माझे हे सांगणे विसरेल , त्याला मी ' टकमक ' टोक दाखविल्याशिवाय राहणार नाही !
लेखन सीमा.
लेखन सीमा.
No comments:
Post a Comment