मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Wednesday, 6 March 2013

लाज वाटते का रे?

३५० वर्षापूर्वी सर्व भारताच्याकैफियती ऐकणाऱ्या माझ्यासारख्याला आज स्वतःची कैफियत तुमच्या समोर मांडावी लागती आहे , याहून मोठे माझ्या आयुष्यातील दुर्दैव ते कोणते ? कारण की , तुमच्या सारखा मी माझ्या परिवाराच्या भविष्याचा विचार न करता तळागाळातील रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्याची स्थापना केली , ती तुमची पोरे - बाळे आणि तुमचा परिवार सुखी रहावा म्हणून , पण आजमी रक्ताचे पाणी करून स्थापना केलेल्या स्वराज्यातील गड - किल्ल्यांची काय अवस्था आहे ? आणि माझे नाव लावून स्वतःची पोटेभरणाऱ्या भारत सरकारच्या पर्यटनखात्याकडून आणि सांगायलाही लाज वाटावी अशा माझ्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन खात्याकडून भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे निधी देऊन सुशोभित केली जात आहेत ! मग मी स्वराज्याची सुरुवात केलेल्या , माझ्याच बारा मावळामधील , आणि सर्व महाराष्ट्रातील मी स्वतः उभे केलेल्या किल्ल्यांची आजची अवस्था तुम्हाला ए.सी कार्यालयात बसून कळणार आहे का रे? एरव्ही आक्रमक भाषणे करणाऱ्यां तुमच्या पैकी किती जण माझ्या गड - किल्ल्यांवर स्वतः पायी चालत जाऊन आलेत रे ? माझे नाव घेवुन जगणाऱ्या तुम्हाला , माझा एवढ्या लवकर विसर पडला का रे ? भविष्यात पण तुम्ही आज जन्माला आलेले सर्व पक्ष हे सर्वविश्व उभे करणारया माझ्यासारख्याला असे तुमचे नाकर्तेपण दाखवणार असाल तर माझ्या सर्व सामान्य रयतेला तुम्ही काय न्याय देणार आहात ? लक्षात ठेवा जो कोणी माझे हे सांगणे विसरेल , त्याला मी ' टकमक ' टोक दाखविल्याशिवाय राहणार नाही !

लेखन सीमा.

No comments:

Post a Comment