इ.स.१ ६५७ मध्ये शिवरायांचं लक्ष्य होत-स्वराज्याच
आरमार....
कारण या समुद्रावर सत्ता होती,
अरबी हबशी आणि फिरंगी पोर्तुगीज यांची. आरमार
उभारायलासुरुवात झाली, एक एक बंदर राजांचे
सहकारी काबीज करून तिथे भगवा फडकवत होते.
त्या दरम्यान पोर्तुगीज व्हाइसरॉय याने आपल्या पोर्तुगीज
आरमार प्रमुखाला पत्र पाठवलं की,
"डोंगरातला राजा आता पाण्यात उतरला, आता कुठे जायचं ते
ठरवा".
शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर सन १६५९ मध्ये
स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. पोर्तुगीज,
सिद्धी, इंग्रजांसारख्या प्रबळ आरमारी शक्तींना तोंड देवून
"सिंधुसागर" स्वराज्याच वर्चस्व निर्माण
करण्यासाठी महाराजांनी उभारलं.
स्वराज्याच्या आरमाराविषयी गोव्याचा व्हाइसरॉय सन
१६६७ मध्ये आपल्या पोर्तुगीजच्या राजाला लिहितो की,
शिवाजीँच नौदलही मला भीतीदायक वाटत. कारण
त्याच्या विरुद्ध आम्ही सुरुवातीस कारवाई न केल्याने त्याने
किनाऱ्यावर चांगले किल्ले बांधले. आणि त्याच्या जवळ
पुष्कळ "तारवे" आहेत.पण ही तारवे मोठी नाहीत,
आपल्या आरमाराच्या जोरावर त्याने इंग्रज व
सिद्धी यांच्याही समुद्रावर लढाई करून "खांदेरी दुर्ग"
उभारला. यावरून
मराठा आरमाराच्या वाढत्या बळाची जाणीव होते..
विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!
No comments:
Post a Comment