मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Wednesday, 6 March 2013

ताब्यात आला गड परी सिंह तो गेला! ॥

पुन्हां सारा उलटला भाला ।
मावळा एक झाला ।
केला मग हल्ला ।
मोंगलाची झाली तारपिट फार ।
पळती हो खाल्ला त्यांनीं लइ मार ।
घेण्याला लावली त्यांना माघार ॥
मामाची झुंज लागली ।
भानाशीं भली ।घालुन खालीं ।
भानुला धाडलं घोर नर्कांत ।
फडफडे भगवा झेंडा किल्ल्यांत ।
प्रसिद्ध झाला तिनहि लोकांत ॥
वृत्तांत सारा घडलेला ।
 कळला राजाला ।
लागली डोळ्यांला ।
 पाण्याची धार, गेला आधार ।
शिवबाला तान्हा प्राणापर प्यार ।
दुःखाचा झाला त्यास लइ भार ॥
हुंदक्यानं आला उमाळा, ।
 शिवबा बोलला ।
हाय ! घात झाला ।
ठेवुन पृथ्वीवरती आम्हांस ।
सोडुन गेला । तान्हा स्वर्गास ! ।
दैवाला नाहिं दया लव खास ॥
चाल
स्वातंत्र्यदेवि च्या गळ्यामधुन मणि गळला ॥
काय एकदांच सद्भाग्यचंद्र मावळला ॥
तो देशभक्तिचा सिंधु कोरडा पडला !॥
माणीक एक हरपला ! । स्वातंत्र्यहंस तो मेला ।
ताब्यांत आला गड परी सिंह तो गेला! ॥
पांडुरंग शाहीर गातो त्याच्या कवनाला ॥१०॥
- शाहीर पां.द.खाडिलकर

No comments:

Post a Comment