मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Saturday, 23 February 2013

परवाच शिव-जयंती झाली. त्या निमित्त माझा एक चांगला अनुभव सर्वां बरोबर वाटून घ्यावा असे वाटते

परवाच शिव-जयंती झाली. त्या निमित्त माझा एक चांगला अनुभव सर्वां बरोबर वाटून घ्यावा असे वाटते.
११९६ जुलै मध्ये म्हणजे सुमारे १७ वर्षांपूर्वी वर्तमान पत्रात एक बातमी वाचली कि एक संघटना शूर वीर बाजी प्रभू देशपांडेंच्या पुण्यतिथीला पन्हाळगड ते विशालगड पदभ्रमण आयोजित करीत आहेत. सोबत संपर्कासाठी दूरध्वनीक्रमांक. दिले होते. मी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्याशी संपर्क साधला आणि माझे नाव दिले. पदभ्रमण शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवसांचे होते. आजही मला ते जसे च्या तसे आठवत आहे. सुमारे ७० चा ग्रुप होता. वय-वर्षे ८ ते ७०, पण बहुतेक १५ ते ४० या वयोगटातील होती. आम्ही मुंबईहून गुरवारी रात्रीच्या महालक्ष्मी एक्ष्प्रेस या गाडीने कोल्हापूर ला गेलो. कोल्हापूर स्थानकातून बस ने पन्हाळगड किल्ल्यावर गेलो. सकाळीसुमारे दोन तास पन्हाळगड किल्ला संपूर्ण बघितला आणि जेऊन झाल्यावर साधारण २-२.३० वाजता आम्ही चालायला सुरुवात केली. पन्हाळगड किल्ला उतरल्यावर थोडीशी चढण आहे आणि मग म्हसाईचे एक विस्तीर्ण पठार लागते. त्याच्या पुढे मग आम्ही पाऊल वाटेने वाटेतले नद्या नाले वाहाळओढे सारे काही तुडवत निघालो पहिल्या दिवशी आम्ही सुमारे ८ तास चाललो आणि पाटेगाव म्हणून एका गावात रात्रीचा मुक्काम केला. त्या वेळी त्या वाटेवर मध्ये मध्ये काही वस्त्या होत्या, पण तिथे जायला डांबरी रस्तादेखील नव्हता. वाटेत फक्त ओढ्यातले दगड गोटे आणि पाला पाचोळा होते. माझ्या मनात शंका आली कि जर कोणी त्या वस्त्यातली व्यक्ती आजारी पडली आणि इस्पितळात पोहोचवायची वेळ आली तरकाही किमी. अंतर डोलीतून जाऊन मगचवाहनाची सोय होऊ शकेल इतका तो मागास भाग आहे. मुंबई पुण्या सारख्या शहरातल्या मुलांना त्याची कल्पनाच येणार नाही. असो. तर अश्या रस्त्यांतून चालत आम्हीपहिल्या दिवशी सुमारे ७-८ तास चालल्यावर पाटेगावला पोहोचलो. वाटेत काही तिकडची लहान मुले आम्हाला काही खाऊ द्यायची. गावातल्याच एका घरात आमची झोपण्याची सोय होती. दुसऱ्या दिवशी साधारण सकाळी ८ वाजता चालायला सुरुवात केली आणि दुपारी२-३ वाजता आम्ही पांढरपाणी या मुक्कामाच्या गावात पोहोचलो. तिथे एका शाळेत आमची सोय केली होती. सात- आठ तास सतत पाठीवर स्याकचे वजन घेऊन चालताना पाय दुखायचे आणि मध्ये विश्रांती साठी म्हणून बसलो कि मग दोन पाऊलेसुद्धा चालायला जीवावर यायचे ! चालताना दोन तीन वेळा दमल्यामुळेवाटले कि आता पुरे, आता नको, पण एकटे तिथे वाटेत कुठे बसणार ? आणिमनात कुठेतरी बाजी प्रभू देशपांडे, मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज कधी काळी याच वाटेवरून गेले असतील, त्यांचे पाय या भूमीला लागले असतील आणि तेतर रात्रीच्या वेळी धो धो पावसात,विजा चमकताना, पाठीवर शत्रुसैन्यपाठलागावर असताना कसे गेले असतील? !! या विचाराने परत आम्ही हुरूप आणून चालायला लागायचो. पांढरपाणीच्या मुक्कामी रात्री आम्ही काहीमनोरंजनाचे कार्यक्रम केले. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता चालायला सुरुवात केली ती गजापुरची खिडी कडे ( पावन खिंड) साधारण सकाळी ९-१० वाजता पोहोचलो.ती पवित्र जागा बघून ऊर भरून आला. बाजींच्या आठवणीने डोळ्यात आसवे तरळली. तिकडे तेव्हा आतासारखी शिडी नव्हती. त्यामुळे झाडाला बांधलेल्या दोरखंडाच्या साह्याने सुमारे चाळीस-पन्नास फूट खोल खिंडीत आम्ही उतरलो आणि परत त्याच आधाराने वर चढलो. खिंडीच्या दोन्ही बाजूंना मोठ मोठे खडक पाहून वाटले नरवीर बाजींच्या अतुलनीय पराक्रमाचे हे खडक साक्षी आहेत !
पावन खिंड बघून आम्ही विशाळगडाच्या वाटेला लागलो. मध्ये मध्ये हिरवीगार शेते होती त्या शेतांच्या बांध्यावरून चालत आम्ही मध्ये रस्ता सोडत होतो आणि जवळचा मार्ग पत्करून पुन्हा पुढे त्या रस्त्याला मिळतहोतो. पांढरपाणीच्या पुढे डांबरीरस्ता लागला. विशाळ गडावर सुद्धा चढायला लोखंडी शिड्या आहेत. त्या चढून आम्ही दुपारी सुमारे २ वाजता विशाळगडावर पोहोचलो. तिथे एका मंदिरात आमची सोय केली होती. विशाळगडावर शिवाजी महाराजांच्याकाहीच खुणा नाही हे बघून मन फार दु:खी झाले.
पन्हाळगड ते विशाळगड हे अंतर सुमारे ७० किमी आहे. एवढे अंतर तीन दिवस चालल्यावर आमच्या तळ-पायांवर गठ्ठे आले होते ! ( जसेडंब बेल्स पहिल्यांदाच उचलल्यावर हातावर येतात )
विशाळगडाहून आम्ही बसने मध्ये तिकडून जवळच असलेले मार्लेश्वर येथील निसर्गरम्य धबधबा आणि मंदिर बघून मुंबईला परतलो. हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय असा होता. माझ्यातला निसर्ग प्रेमी तर खुश झालाच पण माझ्यातला इतिहास प्रेमी जास्त खुश झाला होता.

Mahesh Nadkarni

No comments:

Post a Comment