हिंदवी स्वराज्याचे संस्थापक , महाराष्ट्राचे - || छत्रपती शिवाजी महाराज || म्हणजे महाराष्ट्राचे व तमाम मराठ्यांचे आराध्य दैवत तर
गडकिल्ले आणि सह्याद्री महाराष्ट्राचा मूलाधार.
सुलतानांची गुलामगिरी हेच आयुष्याचे इति कर्तव्य समजणाऱ्या कणाहीन झालेल्या समाजाला महाराजांनी भानावर आणलं.एवढचं नाही तर जगाने कौतुक करावे आणि अखिल हिंदूस्थानाने अभिमान बाळगावा असं अखंड हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या साक्षीने उभे केले.
बाराशेव्या शतकापासून भारतात प्रस्थापित झालेल्या आणि स्थिरावलेल्या सर्व सुलतानांच्या टोळधाडी छत्रपती शिवाजी महाराज यांनी गडकिल्ले आणि सह्याद्री यांच्या मदतीने थोपवले.
बंगाल पासून इराण-इराक पर्यंत अथांग पसरलेल्या मोंगलशाहीचा पातशहा औरंगजेबाचे सुद्धा दक्षिण विजयाचे स्वप्न स्वप्नच राहिले, ते फक्त आणि फक्त शिवराय, त्यांचे सर्व मावळे, गडकिल्ले आणि अनादी काळापूर्वी प्रगट झालेला सह्याद्री.
यां मुळेच हेच महाराष्ट्राचा इतिहास-वर्तमान आणि भविष्य.
http://rajeshivchhatrapati.wordpress.com/
मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.
धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले
माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment