मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Tuesday, 26 February 2013

"सर्वोत्तम अभियंता राजा"..

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सुमारे
पस्तीस वर्षाच्या साधरणपणे 360 किल्ले
जलदुर्गासह नवे बांधले अथवा जुनेदुरुस्त
केले.सिँधुदुर्ग -,विजयदुर्ग सारखे भरसमुद्रातील
जलदुर्ग आजही 350 वर्षे समुद्राच्या भीषण
लाटा अंगावर न खचता उभे आहेत. शिवरायांचे
स्थापत्य अभियांत्रिकीमधी -ल ज्ञान व
कौशल्य पाहुन अनेक पोर्तुगीज, फ्रेँच, इंग्रज
व्यापारी राज्यकर्ते आश्चर्यचकीत झाले होते.
सतराव्या शतकातील बांधकाम क्षेत्रातील
मर्यादा पाहता शिवरायांनी केलेले अजस्त्र
बांधकाम ही एक जागतिक आश्चर्याचीच बाब
आहे. जागतिक आश्चर्य म्हणुन आपण
चिनी भिँतीचा उल्लेख करतो; परंतु
चिनी भिँतीचे बांधकाम सुमारे सहाशे वर्षे चालले
होते.शिवरायांनी -अवघ्या 35 वर्षात केलेले
सर्व प्रकारचे बांधकाम भितीँत विभागल्यास
त्याची सुमारे चार हजार किमी लांबीची भिँत
होईल. यावरुन
छत्रपती शिवाजी महाराजांना स्थापत्य
अभियांत्रिकीमधी -ल निष्णात राजाच म्हणावे
लागेल. प्रत्येक बांधकामाची आखणी,बांधकाम,
मजबुती उपयुक्तता, सौँदर्य आणि विशेष म्हणजे
आयुष्यमान पाहता शिवरायाएवढा तज्ज्ञ
स्थापत्य अभियंता दुसरा इतिहासात सापडत
नाही..
एकच अवाज एकच पर्याय जय जिजाऊ जय
शिवराय.

No comments:

Post a Comment