मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Saturday, 23 February 2013

आज २४ फेब्रु. १६७४वेडात मराठी वीर दौडले सात

२४ फेब्रु. १६७४
“प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!”
आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान
जिवंत जातो याचा महाराजांना राग
आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून
प्रतापरावांची कान उघाडणी केली.
त्या पत्रात एक वाक्य असं होतं
की,
"बहलोल खानास गर्दीस
मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड
दाखवू नका"
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर
मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न
प्रतापरावांना दिवसरात्र सातावीत
होता.अवघे सात मराठे हजारोंच्या सैन्यावर
चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य
विश्वास,
पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं
काही !
प्रतापरावंचं ठीक पण
त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले
नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात
वीर हे मराठी इतिहासातील एक
स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.
प्रतापराव आणि सोबतचे सरदार मरण
पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले.
स्वराज्याची हानी झाली. मात्र
शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं.
पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.
राज्याभिषेकाच्य ा तयारीत असणारेमहाराज प्रतापरावांच्या ह्या बलिदानानंतर उद्गारले " तोंड दाखवू नये म्हणून लिहले,तर तसेच करून गेले"
प्रतापरावांच्या मृत्यूची मानस लागलेली टोचणी शिवरायांनी प्रतापरावांच्या कन्येचा विवाह राजाराम महाराजांशी लाऊन काहीसी कमी केली.
१)विसाजी बल्लाळ
२)दिपाजी राउतराव
३)विठ्ठल पिलाजी अत्रे
४)कृष्णाजी भास्कर
५)सिद्धी हिलाल
६)विठोजी शिंदे
७)सरनौबत प्रतापराव गुजर
"सात दौडले सात दौडले म्हणती सारेसारे,
नेसरखिंडी लोककथा ही अजून 'प्रताप'वारे"
त्या सात स्वामिनिष्ठ मावल्यांस गुढघे टेकून त्रिवार वंदन
शिवपाईक भगव्या झेंड्याचा शिपाई

No comments:

Post a Comment