अंधार झाला आहे , दिवा पाहिजे
महाराष्ट्र नाही तर साऱ्या विश्वाला जिजाऊचा शिवबा पाहिजे....
राजं पुन्हा तो
बाजी पासलकर पाहिजे
पहिल्या लढाईत तुमच्यासाठी
प्राण वेचले पाहिजे...||१||
राजं पुन्हा तो
दर्या सारंग पाहिजे
समुद्रावर जरब बसवण्या
जीगरीचा जिगरबाज पाहिजे ...||२||
राजं पुन्हा तो
नूरखान बेग पाहिजे
कर्म हाच माझा धर्म
मानणारा जिगरबाज मावळा पाहिजे...||३||
राजं पुन्हा तो
जीवा महाल पाहिजे
तुमच्यासाठी जीवाची पर्वा न करता
गनिमाला ठार केले पाहिजे...||४||
राजं पुन्हा तो
बाजी प्रभू पाहिजे
लाख वार झाले असले तरी
तोफांचा आवाज ऐकून देह सोडणारा पाहिजे...||५||
राजं पुन्हा तो
मुरारबाजी पाहिजे
शत्रूवर मृत्यू म्हणून
गरजणारा पाहिजे...||६||
राजं पुन्हा तो
तान्हाजी पाहिजे
मुलाच लग्न सोडून कोंढाण्याच लग्न
करायला निघाला पाहिजे...||७ ||
राजं पुन्हा तो
हिरोजी इंदलकर पाहिजे
स्वतःची जमीन विकून
स्वराज्याची राजधानी बांधणारा पाहिजे...||८||
राजं पुन्हा तो
शिवा काशीद पाहिजे
जन्मला जरी शिवा काशीद असला
तरी शिवराय म्हणवून गेला पाहिजे...||९||
राजं पुन्हा शिवनेरी
दिव्यांनी सजला पाहिजे
साऱ्या विश्वावर भगव्याच
अधीराज्य गाजल पाहिजे...||१०||
अंधार झाला आहे , दिवा पाहिजे
महाराष्ट्र नाही तर साऱ्या विश्वाला जिजाऊचा शिवबा पाहिजे....
जय जिजाऊ
जय शिवराय.
http://rajeshivchhatrapati.wordpress.com/
मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.
धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले
माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment