मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Thursday, 21 February 2013

बादशाहाच्या हातावर

जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशाच्या भेटीस
आगऱ्याला जाण्यास निघाले.जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार
जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला.बरोबर
आपला मुलगा संभांजीराजे,निवडक सरदार ,काही विश्वासू माणसे
आणि बराच खजिना घेतला.मजल दरमजल करत ते आगऱ्यास
पोहचले.
दरबारातील बाणेदारपणा : ठरल्याप्रमाणे शिवराय बादशाहाच्या
दरबारास गेले. छोटे संभाजीराजे सोबत होते.त्या दिवशी औरंगजेब
बादशाहाचा पन्नासावा वाढदिवस होता. बादशाहा दरबार संपवून
सल्लामसलतीच्या महालात गेला.त्याच्या समोर निवडक सरदार
मनाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते. बदशाहाने शिवरायांना मागील
रांगेत उभे केले.मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला
जयवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता.शिवरायांना वाटले,
आपण महाराष्ट्राचे राजे,आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा,पण
बादशाहाने आपाल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय?त्यांचे
डोळे रागाने लाल झाले. हा अपमान त्यांना सहन झाला नाही. रागारागाने
शिवराय महालाबाहेर पडले.ते तडक आपल्या मुक्कामावर गेले. यापुढे
बादशाहाने तोंड पाहायचे नाही,असे त्यांनी ठरवले.
भेटीचा बेत असा बिनसला. घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे
पसरली.
बादशाहाची दगलबाजी : औरंगजेब शिवरायांच्या मुक्कामाच्या
ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला.शिवराय आणि संभाजीराजे
बादशाहाच्या कैदेत पडले.शिवरायांनी ओळखले, की बादशाहाने
आपल्याशी दगलबाजी केली आहे.आता आपल्याला कधीच
सोडणार नाही.
दिवसामागून दिवस जाऊ लागले.एक दिवस शिवरायांनी
बादशाहाकडे अर्ज केला, ‘ मला महाराष्ट्रात जाऊ द्या. ‘ पण बादशाहाने
ते एकले नाही.त्यांनी खूप खटपट केली,पण बादशाहाच्या मानले नाही.
शिवरायांनी मनाशी निर्धार केला. , की काहीही करून बादशाहाच्या कैदेतून
सुटून जायचेच. त्याची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर
आणलेल्या माणसांची दक्षिणेत रवानगी केली.बादशाहाला वाटले,बरे
झाले.शिवाजीचे बळ कमी झाले. आता शिवरायांच्या बरोबर
संभाजीराजे आणि होरोजी फर्जद व मदारी मेहतर हे सेवक, एवढेच जण
राहिले.
पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले.सोंगच ते !
त्यांच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या. हकीम ,वैद्य आले.
औषधपाणी सुरु झाले.आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व
मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली.
पेटाऱ्यातून पसार झाले: पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत,
पण पुढेपुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले.रोजरोज काय
पाहायचे,असे त्यांना वाटले.एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी
हिरोजीला आपल्या जागी झोपवले,मदरीस त्याचे पाय चेपत बसवले.
शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले. पेटारे निघाले.पुढे
ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले. तेथे शिवरायांचे स्वामीभक्त
सेवक घोडे घेऊन तयार होते. इकडे हिरोजी आणि मदारी ‘ महाराजांचे
औषध आणायला जातो, असे सांगून तेथून निसटले.
हादरले.शिवाजीचा जारीने तपास लावण्यासाठी सगळीकडे हेर पाठवले,
पण व्यर्थ, बादशाहाच्या झुकांडी देत देत शिवराय आपल्या मुलाखाकडे
निघाले त्यांनी संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले व ते पुढे
निघाले.राजगडास शिवराय सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य
वाटले.पुढे दोन महिन्यांनी संभाजीराजे साखरूप राजगडास येऊन
पोहोचेले,अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशाहाच्या हातावर तुरी देऊन
शिवरायांनी आपली सुटला करून घेतली.ही घटना सन १६६६ मध्ये घडली .

No comments:

Post a Comment