सुरतेवर छापा : या विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत,
औरंगजेब बादशाहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या,तेव्हा
बादशाहावर जबर बसण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा
घातला.कुठे पुणे व कुठे सुरत ? सुरत म्हणजे त्या वेळीचे मुघली
मुलाखतील मोठी व्यापारपेठ . खूप सधन . शिवरायांनी सुरतेवर छापा
घालून लक्षावधी रुपयांची लुट मिळवली.सुरतेच्या लुटीत शिवरायांनी
नीती सोडली नाही.चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही .
स्त्रियांना तसदी दिली नाही.औरंगजेब बादशाहाच्या सुरतेची शिवरायांनी
बेसुरत केली.त्यामुळे बादशाहा भयंकर चिडला होता.मराठ्यांचे राज्य
नष्ट करण्याचा त्याने निश्चय केला.मिर्झाराजे जयसिंग या आपल्या
बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले.त्याच्या सोबतीला
दिलेरखान हा आपला विश्वासू सरदार दिला.अलोट खजिना आणि
अफाट दारूगोळाही बरोबर दिला.जयसिंग आणि दिलेरखान प्रचंड
फौजेसह दक्षिणेत येऊन पोहचले.स्वराज्यावर फार मोठे संकट आले.
सुरतेच्या मोहिमेवर शिवराय परततात तोच त्यांना कर्नाटकातून एक
वाईट बतामी समजली.शहाजीराजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती
निधन झाले.शिवराय व जिजाऊ यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला .
मातोश्रींच्या गळा पडून शिवरायांनी या दु:खातून त्यांना सावरले
सन ( १६६४)
पुरंदराला मुघलांचा वेढा: पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट
किल्ला होता.हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ
शकणार नाही,हे दिलेरखान जाणून होता.त्यामुळे दिलेरखानाने पुरंदरला
वेढा दिला.त्याची फौज फार मोठी होती,पण पुरंदरचा किल्लेदार
मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता.त्याचा हाताखालचे शिपाई मोठे
शूर गडी होते. हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा
राहिला.
दिलेरखानाच्या तोफा कडाडू लागल्या . तोफेचे लालभडक गोळे
किल्ल्यावर कोसळू लागले,पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले
नाहीत. ते अधिक जोराने झुंजू लागले.मुघलांनी तोफांचा भडीमार केला.
माचीचा बरुज ढासळला. मुघल माचीवर घुसले . दिलेरखानाने माची
जिंकली.मराठ्यांनी वरच्या बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला.ते लढतच
राहिले. दिलेरखान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता.
मुरारबाजी रागाने लाल झाला होता. त्याने पाचशे मावळे निवडले.
त्यांना घेऊन त्याने मुघालांवर हल्ला करायचा बेत केला.बालेकिल्ल्याचा
दरवाजा उघडला. हर हर महदेव’ अशी गर्जना करत मुरारबाजी आणि
त्याचे मावळे मुघालांवर तुटून पडले.थोडा वेळ भयंकर लढाई झाली.
मुघलांचे सैन्य अफाट होते,पण मराठ्यांनी त्यांचा धुव्वा उडवला.शेवटी
मुघलांनी माघार घेतली.ते दिलेरखानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत
सुटले.
मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला.मुरारबाजीचे सैन्य
दिलेरखानाच्या छावणीत घुसले.छावणीत एकच गोंधळ माजला.
धावाधाव,आरडओरड ,किंकाळ्या यांचा हाहाकार उडाला.घाईघाईने
दिलेरखान हत्तीवर अंबारीत बसला.त्याने समोर पहिले,तो त्यास
मुरारबाजी दिसला.मुराराबाजीची तलवार कोणाच्या छाताडात,कोणाच्या
मस्तकात,तर कोणाच्या कंठात घुसत होती.मुरारबाजी कोणालाही
आटोपत नव्हता.त्याचे शौर्य बघून दिलेरखान थक्क झाला.
मुरारबाजीचा अतुल पराक्रम: दिलेरखानला बघून मुरारबाजी
चवताळला. “कापा,तोड,मुडदे पाडा,असे ओरडून तो शत्रूवर
धावला.त्याची समशेर जोराने फिरू लागली.जो आड आला,तो ठार
झाला.या एकट्या विराला मुघलांनी चोहोकडून घेरले.इतक्यात
दिलेरखान अंबारीतून , “थांबा ! मुघल थांबले.क्षणभर मागे
सरले.खान मुरारबाजीला म्हणाला , मुरारबाजी ,तुझ्यासारखा
समशेरबहाद्दर मी आजवर पहिला नाही.तू आमच्या बाजूला ये,कौल
घे.बादशाहा तुला सरदार करतील.जहागिरी देतील.बक्षीस देतील!
मुरारबाजीने दिलेराखानाचे शब्द एकले.रागाने त्याचे डोळे लाल झाले.
तो चवताळून म्हणाला, “ अरे ,आम्ही शिवाजीमहाराजांची माणसे ! तुझा
कौल घेतो की काय? आम्हांला काय कमी आहे? तुझ्या बादशाहीची
जहागिरी हवी कोणाला? मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली
आणि तुफान कत्तल करत सुटला.दिलेरखानाने अंबारीतून बाण
सोडला.तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला.तो जमिनीवर
कोसळला.मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बालेकिल्ला गाठला.
किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दु:ख झाले,पण एक मुरारबाजी
पडला तरी काय झाले? आम्ही तैसेच शूर अहो.हिंमत धरून लढतो,
असे म्हणून ते न डगमगता पुन्हा निकराने लढू लागले.
ही बतामी शिवरायांना कळल्यावर ते फार दु:खी झाले.त्यांनी विचार
केला,एकेक किल्ला वर्षवर्ष लढवता येईल,पण विनाकारण माणसे
मरतील.शिवरायांना ते नको होते.
पुरंदरचा तह : करणार काय ? शक्ती चालेना,युक्ती उपयोगी
पडेना,तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य ; म्हणून मुघलांशी तह
करायचा असे शिवरायांनी ठरवले.शिवराय स्वत: जयसिंगाकडे गेले.
त्याच्याशी मुत्सद्देगिरीचे बोलणे केले.ते म्हणाले,मिर्झाराजे ,आपण
रजपूत आहात.आमचे दु:ख आपण जानता.बादशाहाच्या स्वाऱ्यांनी
महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे.लोकांचे हाल होत आहेत.लोक सुखी
व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे! आपणही हे
काम हाती घ्या.मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू”
जयसिंग मोठा धूर्त होता.त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले.
लक्ष होनांचा मुलूख मुघालांस देण्याचे कबूल केले.हा तह १६६५ साली
झाला.
पुरंदरचा तह झाला.याच वेळी शिवरायांनी आगऱ्यास जाऊन
बादशाची भेट घ्यावी,असे जयसिंगाने सुचवले.त्यांना सुरक्षितेची
हमी दिली.जयसिंगाच्या सूचनेवर विचार केला.बादशाहा
कपटी आहे,स्वत:च्या भावाशीसुद्धा त्याने दगलबाजी केली,हे शिवराय
ओळखून होते.तरीपण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे ,असे
त्यांनी ठरवले.आपण बादशाची भेट घेण्यास आगऱ्याला जाण्यास तयार
आहोत,असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले.
औरंगजेब बादशाहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या,तेव्हा
बादशाहावर जबर बसण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा
घातला.कुठे पुणे व कुठे सुरत ? सुरत म्हणजे त्या वेळीचे मुघली
मुलाखतील मोठी व्यापारपेठ . खूप सधन . शिवरायांनी सुरतेवर छापा
घालून लक्षावधी रुपयांची लुट मिळवली.सुरतेच्या लुटीत शिवरायांनी
नीती सोडली नाही.चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही .
स्त्रियांना तसदी दिली नाही.औरंगजेब बादशाहाच्या सुरतेची शिवरायांनी
बेसुरत केली.त्यामुळे बादशाहा भयंकर चिडला होता.मराठ्यांचे राज्य
नष्ट करण्याचा त्याने निश्चय केला.मिर्झाराजे जयसिंग या आपल्या
बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले.त्याच्या सोबतीला
दिलेरखान हा आपला विश्वासू सरदार दिला.अलोट खजिना आणि
अफाट दारूगोळाही बरोबर दिला.जयसिंग आणि दिलेरखान प्रचंड
फौजेसह दक्षिणेत येऊन पोहचले.स्वराज्यावर फार मोठे संकट आले.
सुरतेच्या मोहिमेवर शिवराय परततात तोच त्यांना कर्नाटकातून एक
वाईट बतामी समजली.शहाजीराजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती
निधन झाले.शिवराय व जिजाऊ यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला .
मातोश्रींच्या गळा पडून शिवरायांनी या दु:खातून त्यांना सावरले
सन ( १६६४)
पुरंदराला मुघलांचा वेढा: पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट
किल्ला होता.हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ
शकणार नाही,हे दिलेरखान जाणून होता.त्यामुळे दिलेरखानाने पुरंदरला
वेढा दिला.त्याची फौज फार मोठी होती,पण पुरंदरचा किल्लेदार
मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता.त्याचा हाताखालचे शिपाई मोठे
शूर गडी होते. हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा
राहिला.
दिलेरखानाच्या तोफा कडाडू लागल्या . तोफेचे लालभडक गोळे
किल्ल्यावर कोसळू लागले,पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले
नाहीत. ते अधिक जोराने झुंजू लागले.मुघलांनी तोफांचा भडीमार केला.
माचीचा बरुज ढासळला. मुघल माचीवर घुसले . दिलेरखानाने माची
जिंकली.मराठ्यांनी वरच्या बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला.ते लढतच
राहिले. दिलेरखान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता.
मुरारबाजी रागाने लाल झाला होता. त्याने पाचशे मावळे निवडले.
त्यांना घेऊन त्याने मुघालांवर हल्ला करायचा बेत केला.बालेकिल्ल्याचा
दरवाजा उघडला. हर हर महदेव’ अशी गर्जना करत मुरारबाजी आणि
त्याचे मावळे मुघालांवर तुटून पडले.थोडा वेळ भयंकर लढाई झाली.
मुघलांचे सैन्य अफाट होते,पण मराठ्यांनी त्यांचा धुव्वा उडवला.शेवटी
मुघलांनी माघार घेतली.ते दिलेरखानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत
सुटले.
मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला.मुरारबाजीचे सैन्य
दिलेरखानाच्या छावणीत घुसले.छावणीत एकच गोंधळ माजला.
धावाधाव,आरडओरड ,किंकाळ्या यांचा हाहाकार उडाला.घाईघाईने
दिलेरखान हत्तीवर अंबारीत बसला.त्याने समोर पहिले,तो त्यास
मुरारबाजी दिसला.मुराराबाजीची तलवार कोणाच्या छाताडात,कोणाच्या
मस्तकात,तर कोणाच्या कंठात घुसत होती.मुरारबाजी कोणालाही
आटोपत नव्हता.त्याचे शौर्य बघून दिलेरखान थक्क झाला.
मुरारबाजीचा अतुल पराक्रम: दिलेरखानला बघून मुरारबाजी
चवताळला. “कापा,तोड,मुडदे पाडा,असे ओरडून तो शत्रूवर
धावला.त्याची समशेर जोराने फिरू लागली.जो आड आला,तो ठार
झाला.या एकट्या विराला मुघलांनी चोहोकडून घेरले.इतक्यात
दिलेरखान अंबारीतून , “थांबा ! मुघल थांबले.क्षणभर मागे
सरले.खान मुरारबाजीला म्हणाला , मुरारबाजी ,तुझ्यासारखा
समशेरबहाद्दर मी आजवर पहिला नाही.तू आमच्या बाजूला ये,कौल
घे.बादशाहा तुला सरदार करतील.जहागिरी देतील.बक्षीस देतील!
मुरारबाजीने दिलेराखानाचे शब्द एकले.रागाने त्याचे डोळे लाल झाले.
तो चवताळून म्हणाला, “ अरे ,आम्ही शिवाजीमहाराजांची माणसे ! तुझा
कौल घेतो की काय? आम्हांला काय कमी आहे? तुझ्या बादशाहीची
जहागिरी हवी कोणाला? मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली
आणि तुफान कत्तल करत सुटला.दिलेरखानाने अंबारीतून बाण
सोडला.तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला.तो जमिनीवर
कोसळला.मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बालेकिल्ला गाठला.
किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दु:ख झाले,पण एक मुरारबाजी
पडला तरी काय झाले? आम्ही तैसेच शूर अहो.हिंमत धरून लढतो,
असे म्हणून ते न डगमगता पुन्हा निकराने लढू लागले.
ही बतामी शिवरायांना कळल्यावर ते फार दु:खी झाले.त्यांनी विचार
केला,एकेक किल्ला वर्षवर्ष लढवता येईल,पण विनाकारण माणसे
मरतील.शिवरायांना ते नको होते.
पुरंदरचा तह : करणार काय ? शक्ती चालेना,युक्ती उपयोगी
पडेना,तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य ; म्हणून मुघलांशी तह
करायचा असे शिवरायांनी ठरवले.शिवराय स्वत: जयसिंगाकडे गेले.
त्याच्याशी मुत्सद्देगिरीचे बोलणे केले.ते म्हणाले,मिर्झाराजे ,आपण
रजपूत आहात.आमचे दु:ख आपण जानता.बादशाहाच्या स्वाऱ्यांनी
महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे.लोकांचे हाल होत आहेत.लोक सुखी
व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे! आपणही हे
काम हाती घ्या.मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू”
जयसिंग मोठा धूर्त होता.त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले.
लक्ष होनांचा मुलूख मुघालांस देण्याचे कबूल केले.हा तह १६६५ साली
झाला.
पुरंदरचा तह झाला.याच वेळी शिवरायांनी आगऱ्यास जाऊन
बादशाची भेट घ्यावी,असे जयसिंगाने सुचवले.त्यांना सुरक्षितेची
हमी दिली.जयसिंगाच्या सूचनेवर विचार केला.बादशाहा
कपटी आहे,स्वत:च्या भावाशीसुद्धा त्याने दगलबाजी केली,हे शिवराय
ओळखून होते.तरीपण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे ,असे
त्यांनी ठरवले.आपण बादशाची भेट घेण्यास आगऱ्याला जाण्यास तयार
आहोत,असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले.
No comments:
Post a Comment