आदिलशाही हादरली: विजापूरच्या दरबारातील गोष्ट,शिवरायांच्या
वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला.दरबारात
झाडून सारे सरदार गोळा झाले.एकेक गाजलेले समशेरबहाद्दर दरबारात
हजर होते.आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीण जातीने दरबारात
हजर होती.दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता-शिवाजीचा बिमोड कसा
करायचा?
बडी साहेबीण हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला,
“सांगा,कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला?”
दरबारात शांतता पसरली.जो तो आपल्या जागी चूप! शिवरायांशी
मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार? जो तो एकमेकांकडे बघू
लागला.एवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे
आला.त्याचे नाव होते अफजलखान .
खानाने विडा उचलला: तबकातील विडा उचलत अफजखान
म्हणाला, ‘शिवाजी ? कुठला शिवाजी ? त्याला मी जिवंत कैद करून
येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून
विजापुरी आणतोच आणतो.”
अफजलखान म्हणजे विजापूर दरबारात भारी सदर.तुफान
ताकदीचा ! पोलादी पहार हातांनी वाकवणारा .भल्याबुऱ्या कोणत्याही
मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा! अशा अफजाखानाने
शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात
उचलला.सारा दरबार खुश झाला.दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला
वाटले,आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो! थोड्याच
दिवसांत विजापूर दरबारात साखळदंडांत बांधलेल्या अवस्थेत शिवाजी
हजर होणार ,नाहीतर त्यांचे मुंडके तरी दरबारात सादर होणार.
अफजखान मोठ्या ऐटीने,थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला.
त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले.यापूर्वी
अफजखान बारा वाईचा सुभेदार होता.त्यामुळे त्याला त्या
मुलखाची चांगली माहिती होती.मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट
चालू लागला.
स्वराज्यावरील संकट : शिवराय त्या वेळी रायगडावर होते.त्यांना
अफजलखान चालून येत आहे ही बातमी कळली.स्वराज्यावर मोठे
संकट आले,हे त्यांनी ओळखले,पण ते डगमगले नाहीत.त्यांनी विचार
केला,खान कपटी,त्याची फौज मोठी आपले राज्य लहान,आपले
सैन्य लहान.उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार
नाही ! त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे,असे शिवरायांनी
ठरवले .ते रायगडावरून जीजामातेशी सल्लामसलत करून,तसेच त्यांचा
आशीर्वाद घेवून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले.
अफजाखानाचे डावपेच :शिवराय प्रतापगडावर गेले,ही
बातमी खानाला कळताच तो चिडला.त्याला माहित होते,प्रतापगडावर
चालून जाणे सोपे नाही,कारण तो किल्ला होता डोंगरात.भोवताली
घनदाट जंगल होते,वाटेत उंचउंच डोंगर होते. फौजेला जायला चांगली
वाट नव्हती.तोफा चढवायला मार्ग नव्हता.शिवाय तेथे जंगली
जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट !
शिवरायांनी प्रतापगड खाली उतरून यावे, म्हणून खानाने डावपेच
खेळण्यास सुरुवात केली.तुळजापूर,पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव
दिला.रयतेचा खूप छळ केला.हे सारे ऐकून तरी शिवराय प्रतापगड
सोडतील व बाहेर येतील,असा खानाचा डाव होता.शिवरायांनी
खानाचा डाव ओळखला.त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही,तेव्हा खानाने
दुसरा डाव टाकला.प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप
पाठवला, ‘ तुम्ही माझ्या मुलासारखे , मला भेटायला या .आमचे किल्ले
परत द्या. तुम्हांला मी आदिलशाहाकडून सरदारकी देवावितो.’
शेरास सव्वाशेर : खान आपल्याशी कपटी डाव खेळत आहे,हे
शिवरायांनी झटकन ओळखले.ते सावधगिरीने वागत होते.त्यांनी
खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला.त्यांनी
खानाला निरोप पाठवला, ‘खानसाहेब ,मी तुम्हचे किल्ले घेतले.मी
अपराधी आहे.मला क्षमा करा.आपणच प्रतापगडाखाली भेटायला
यावे.मला तिकडे येण्याची भीती वाटते.’
शिवरायांचा निरोप ऐकून अफजखान हसला. ‘वा! बहोत ख़ुशी .’
आपली दाढी कुरवाळत तो म्हणाला.त्याला वाटले,या
अफजलखानापुढे शिवाजीची काय बिशाद! हा डरपोक माझ्याशी कसली
लढाई खेळतो! आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे.
बस्स ! खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला.
भेट ठरली: प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली.
दिवस ठरला,वेळ ठरली. भेटीच्या वेळी दोघांनी आपल्याबरोबर एक-
एक सेवक आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर
ठेवावे असे ठरले.महाराजांनी खाणासाठी चांगली वाट तयार करवून
घेतली.भेटीसाठी छानदार शामियाना उभारला.
भेटीची तयारी: भेटीचा दिवस उजाडला.सकाळी शिवरायांनी
भवानीदेवीचे दर्शन घेतले.थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास
सुरुवात केली.पायांत सुरवार चढवली.अंगात चिलखत घातले.त्यावर
जरीचे कुडते व अंगरखा घातला.डोक्यास जिरेटोप घातले.त्यावर
मंदील बांधला.डाव्या हाताच्या बोटांत वाघनखे चडवली.त्याच
हाताच्या अस्तनीत बिचवा लपवला.सोबत पट्टा घेतला.शिवराय
खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले.
बाहेर सरदार उभे होते. शिवराय त्यांना म्हणाले, “ गड्यांनो
आपापली कामे नीट करा.भवानीआई यश देणार आहे, पण समजा
आमचे काही बरेवाईट झाले,तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना
गादीवर बसावा.मासाहेबांच्या आज्ञेत वागा.स्वराज्य वाढवा.रयत सुखी
करा.आम्ही निघतो! शिवराय निघाले.बरोबर वकील पंताजी
गोपीनाथ आणि जिवाजी महाला,संभाजी कावजी,येसाजी कंक ,सिद्दी
इब्राहिम इत्यादी दहा अंगरक्षक होते.
खान शिवरायांच्या आधीचा शामियान्यात येऊन बसला होता.
मनोराज्य करत होता.त्यांच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा
हत्यारबंद शिपाई उभा होता.तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता.
शिवराय शामियान्याच्या दाराजवळ आले.बडा सय्यदकडे पाहतच ते
तेथेच उभे राहिले.खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले,
“ शिवाजीराजे आत का येत नाहीत? “
वकील म्हणाला, “ ते बडा सय्यदला भितात.त्याला तेवढा दूर करा !
बडा सय्यद दूर झाला.शिवराय आत गेले.खान उठून म्हणाला , “ या
राजे , भेटा आम्हांला .”
अफजलखानाशी झटापट : महाराज सावध होऊन पुढे झाले.
खानाने शिवरायांना आलिंगन दिले.धिप्पाड खानापुडे शिवराय खुजे
वाटत होते . शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले.त्यासरशी
खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत
दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला.
शिवरायांचा अंगावरील अंगरखा तर्र्कन फाटली.अंगरख्याखाली
चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले.त्यांनी खानाचा डाव
ओळखला .अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटात वाघनखांचा मारा
केला.डाव्या हाताच्या अस्तनीत लपलेला बिचवा उजव्या हाताने
काढून त्यांनी तो खानाच्या पोटात खुपसला.खानाची आतडी
बाहेर पडली .खान कोसळला .एवढ्यात त्यांचा वकील कृष्णाजी भास्कर
पुढे आला.त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला, पण
शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावत त्याला ठार केले.ही खणखणी ऐकून बडा
सय्यद शामियान्यात घुसला.तो शिवरायांवर वार करणार एवढ्यात
जिवाजी महाला धावून आला.बडा साय्यदचा वार आपल्या अंगावर
घेऊन जिवाजी महालाने एका घावत त्याला जागच्याजागी ठार केले.
होता जिवा म्हणून वाचला शिवा,अशी म्हण पुढे रूढ झाली.
अफजलखानाच्या फौजेची दाणादाण : विजयी शिवराय गडावर
गेले.इशाऱ्याची तोफ झाली.शिवरायांचे सैन्ये इशाऱ्यांची वाटच बघत होते.
तोफ होताच झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्ये खानाच्या
फौजेवर तुटून पडले.खानाच्या फौजा बेसावध होत्या .त्यांना पळायलाही
वाट सापडेना.मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला.आणि खानाच्या
फौजेचा धुव्वा उडवला.अफजाखानाचा मुलगा फाजलखान कसाबसा
निसटला व विजापूरला पोहोचला. त्याने सांगितलेली बातमी ऐकून
विजापुरास हाहाकार उडाला.
विजापुरात सर्वांत बलाढ्य सरदार शिवरायांनी हां हां म्हणता धुळीस
मिळवला.शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले. त्यांच्या पराक्रमाचे
पोवाडे सह्याद्रीच्या कडेकपारीतून घुमू लागले.
वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला.दरबारात
झाडून सारे सरदार गोळा झाले.एकेक गाजलेले समशेरबहाद्दर दरबारात
हजर होते.आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीण जातीने दरबारात
हजर होती.दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता-शिवाजीचा बिमोड कसा
करायचा?
बडी साहेबीण हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला,
“सांगा,कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला?”
दरबारात शांतता पसरली.जो तो आपल्या जागी चूप! शिवरायांशी
मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार? जो तो एकमेकांकडे बघू
लागला.एवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे
आला.त्याचे नाव होते अफजलखान .
खानाने विडा उचलला: तबकातील विडा उचलत अफजखान
म्हणाला, ‘शिवाजी ? कुठला शिवाजी ? त्याला मी जिवंत कैद करून
येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून
विजापुरी आणतोच आणतो.”
अफजलखान म्हणजे विजापूर दरबारात भारी सदर.तुफान
ताकदीचा ! पोलादी पहार हातांनी वाकवणारा .भल्याबुऱ्या कोणत्याही
मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा! अशा अफजाखानाने
शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात
उचलला.सारा दरबार खुश झाला.दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला
वाटले,आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो! थोड्याच
दिवसांत विजापूर दरबारात साखळदंडांत बांधलेल्या अवस्थेत शिवाजी
हजर होणार ,नाहीतर त्यांचे मुंडके तरी दरबारात सादर होणार.
अफजखान मोठ्या ऐटीने,थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला.
त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले.यापूर्वी
अफजखान बारा वाईचा सुभेदार होता.त्यामुळे त्याला त्या
मुलखाची चांगली माहिती होती.मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट
चालू लागला.
स्वराज्यावरील संकट : शिवराय त्या वेळी रायगडावर होते.त्यांना
अफजलखान चालून येत आहे ही बातमी कळली.स्वराज्यावर मोठे
संकट आले,हे त्यांनी ओळखले,पण ते डगमगले नाहीत.त्यांनी विचार
केला,खान कपटी,त्याची फौज मोठी आपले राज्य लहान,आपले
सैन्य लहान.उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार
नाही ! त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे,असे शिवरायांनी
ठरवले .ते रायगडावरून जीजामातेशी सल्लामसलत करून,तसेच त्यांचा
आशीर्वाद घेवून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले.
अफजाखानाचे डावपेच :शिवराय प्रतापगडावर गेले,ही
बातमी खानाला कळताच तो चिडला.त्याला माहित होते,प्रतापगडावर
चालून जाणे सोपे नाही,कारण तो किल्ला होता डोंगरात.भोवताली
घनदाट जंगल होते,वाटेत उंचउंच डोंगर होते. फौजेला जायला चांगली
वाट नव्हती.तोफा चढवायला मार्ग नव्हता.शिवाय तेथे जंगली
जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट !
शिवरायांनी प्रतापगड खाली उतरून यावे, म्हणून खानाने डावपेच
खेळण्यास सुरुवात केली.तुळजापूर,पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव
दिला.रयतेचा खूप छळ केला.हे सारे ऐकून तरी शिवराय प्रतापगड
सोडतील व बाहेर येतील,असा खानाचा डाव होता.शिवरायांनी
खानाचा डाव ओळखला.त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही,तेव्हा खानाने
दुसरा डाव टाकला.प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप
पाठवला, ‘ तुम्ही माझ्या मुलासारखे , मला भेटायला या .आमचे किल्ले
परत द्या. तुम्हांला मी आदिलशाहाकडून सरदारकी देवावितो.’
शेरास सव्वाशेर : खान आपल्याशी कपटी डाव खेळत आहे,हे
शिवरायांनी झटकन ओळखले.ते सावधगिरीने वागत होते.त्यांनी
खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला.त्यांनी
खानाला निरोप पाठवला, ‘खानसाहेब ,मी तुम्हचे किल्ले घेतले.मी
अपराधी आहे.मला क्षमा करा.आपणच प्रतापगडाखाली भेटायला
यावे.मला तिकडे येण्याची भीती वाटते.’
शिवरायांचा निरोप ऐकून अफजखान हसला. ‘वा! बहोत ख़ुशी .’
आपली दाढी कुरवाळत तो म्हणाला.त्याला वाटले,या
अफजलखानापुढे शिवाजीची काय बिशाद! हा डरपोक माझ्याशी कसली
लढाई खेळतो! आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे.
बस्स ! खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला.
भेट ठरली: प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली.
दिवस ठरला,वेळ ठरली. भेटीच्या वेळी दोघांनी आपल्याबरोबर एक-
एक सेवक आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर
ठेवावे असे ठरले.महाराजांनी खाणासाठी चांगली वाट तयार करवून
घेतली.भेटीसाठी छानदार शामियाना उभारला.
भेटीची तयारी: भेटीचा दिवस उजाडला.सकाळी शिवरायांनी
भवानीदेवीचे दर्शन घेतले.थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास
सुरुवात केली.पायांत सुरवार चढवली.अंगात चिलखत घातले.त्यावर
जरीचे कुडते व अंगरखा घातला.डोक्यास जिरेटोप घातले.त्यावर
मंदील बांधला.डाव्या हाताच्या बोटांत वाघनखे चडवली.त्याच
हाताच्या अस्तनीत बिचवा लपवला.सोबत पट्टा घेतला.शिवराय
खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले.
बाहेर सरदार उभे होते. शिवराय त्यांना म्हणाले, “ गड्यांनो
आपापली कामे नीट करा.भवानीआई यश देणार आहे, पण समजा
आमचे काही बरेवाईट झाले,तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना
गादीवर बसावा.मासाहेबांच्या आज्ञेत वागा.स्वराज्य वाढवा.रयत सुखी
करा.आम्ही निघतो! शिवराय निघाले.बरोबर वकील पंताजी
गोपीनाथ आणि जिवाजी महाला,संभाजी कावजी,येसाजी कंक ,सिद्दी
इब्राहिम इत्यादी दहा अंगरक्षक होते.
खान शिवरायांच्या आधीचा शामियान्यात येऊन बसला होता.
मनोराज्य करत होता.त्यांच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा
हत्यारबंद शिपाई उभा होता.तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता.
शिवराय शामियान्याच्या दाराजवळ आले.बडा सय्यदकडे पाहतच ते
तेथेच उभे राहिले.खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले,
“ शिवाजीराजे आत का येत नाहीत? “
वकील म्हणाला, “ ते बडा सय्यदला भितात.त्याला तेवढा दूर करा !
बडा सय्यद दूर झाला.शिवराय आत गेले.खान उठून म्हणाला , “ या
राजे , भेटा आम्हांला .”
अफजलखानाशी झटापट : महाराज सावध होऊन पुढे झाले.
खानाने शिवरायांना आलिंगन दिले.धिप्पाड खानापुडे शिवराय खुजे
वाटत होते . शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले.त्यासरशी
खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत
दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला.
शिवरायांचा अंगावरील अंगरखा तर्र्कन फाटली.अंगरख्याखाली
चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले.त्यांनी खानाचा डाव
ओळखला .अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटात वाघनखांचा मारा
केला.डाव्या हाताच्या अस्तनीत लपलेला बिचवा उजव्या हाताने
काढून त्यांनी तो खानाच्या पोटात खुपसला.खानाची आतडी
बाहेर पडली .खान कोसळला .एवढ्यात त्यांचा वकील कृष्णाजी भास्कर
पुढे आला.त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला, पण
शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावत त्याला ठार केले.ही खणखणी ऐकून बडा
सय्यद शामियान्यात घुसला.तो शिवरायांवर वार करणार एवढ्यात
जिवाजी महाला धावून आला.बडा साय्यदचा वार आपल्या अंगावर
घेऊन जिवाजी महालाने एका घावत त्याला जागच्याजागी ठार केले.
होता जिवा म्हणून वाचला शिवा,अशी म्हण पुढे रूढ झाली.
अफजलखानाच्या फौजेची दाणादाण : विजयी शिवराय गडावर
गेले.इशाऱ्याची तोफ झाली.शिवरायांचे सैन्ये इशाऱ्यांची वाटच बघत होते.
तोफ होताच झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्ये खानाच्या
फौजेवर तुटून पडले.खानाच्या फौजा बेसावध होत्या .त्यांना पळायलाही
वाट सापडेना.मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला.आणि खानाच्या
फौजेचा धुव्वा उडवला.अफजाखानाचा मुलगा फाजलखान कसाबसा
निसटला व विजापूरला पोहोचला. त्याने सांगितलेली बातमी ऐकून
विजापुरास हाहाकार उडाला.
विजापुरात सर्वांत बलाढ्य सरदार शिवरायांनी हां हां म्हणता धुळीस
मिळवला.शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले. त्यांच्या पराक्रमाचे
पोवाडे सह्याद्रीच्या कडेकपारीतून घुमू लागले.
No comments:
Post a Comment