मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे.
यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे.
यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल.

धन्यवाद
आपला मित्र कवी/लेखक- गणेश पावले

माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. http://rajeshivchhatrapati.wordpress.com/

Thursday, 21 February 2013

शर्थीन खिंड लढवली

पन्हाळा जिंकला आणि आदिलशाहा चिडला:
अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला.त्याच्या
मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला.
त्यामुळे आदिलशाहा भयंकर चिडला.त्याला अन्न पाणी गोड लागेना.
शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जौहर या सरदाराला पाठवले.
फार मोठी फौज घेऊन सिद्दी जौहर निघाला.फाजलाखानही बापाच्या
वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्या बरोबर निघाला.
पन्हाळगडच्या वेढा : सिद्दी जौहर शूर पण क्रूर होता.त्याची
शिस्त कडक होती.त्यांने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला.शिवरायांना
गडात कोंडले.पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते.त्यामुळे पावसाळा सुरु
झाला,की सिद्ध जौहर वेढा उठवील.असे शिवरायांना वाटले,पण
पाऊस सुरु होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची सिधोरी
संपत आली .आता काय करावे? शक्तीचे काम नाही, तेव्हा युक्तीने
सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. “ लवकरच किल्ला तुमच्या
स्वाधीन करतो,” असा निरोप त्यांनी सिद्दीला पाठवला.तो खुश झाला.
त्याने ते कबुल केले.
वेढ्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते.शिवाजी शरण येत
आहे, हे ऐकून त्यांना आनंद झाला. खाणे-पिणे,गाणे-बजावणे व
हुक्कापाणी यांत ते दंग होऊन गेले.
शिवराय वेढ्यातून बाहेर: शिवरायांनी वेढ्यातून निसटून
जाण्यासाठी एक युक्ती योजली . त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या.
एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचे
सोंग घेतलेली व्यक्ती राज दिंडी दरवाजातून बाहेर पडणार.दुसरी पालखी
शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि
शिवाजीराजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोस करणार,एवढ्यात
शिवराय अवगड वाटेने निसटून जाणार,अशी योजना होती; पण
शिवरायांचे सोंग कोण घेणार ? असे सोंग घ्यायचे म्हणजे मरणाला
सामोरे जायचे ; पण एक बहादुर तरुण तयार झाला. तो दिसायला
शिवरायांसारखाच होता आणि त्याचे नावही शिवाजीच होते. शिवरायांच्या
सेवेतील केसभूषा करणारा तो सेवक होता. तो मोठा धाडसी आणि चेतूर
होता.
ठरल्याप्रमाणे सोंग घेतलेल्या शिवाजीची पालखी राजादिंडीच्या बाहेर
पडली.रात्रीच वेळ होती. धोधो पाऊस पडत होता,तरीही शत्रूचे काहीही
सैनिक पहारा देत होते. त्यांनी ही पालखी पकडली.शिवाजीराजाच
पकडला असे समजून त्यांने ती पालखी सिद्दी जौहरच्या छावणीत
नेली.तिथे जल्लोश सुरु झाला.दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने
गडाबाहेर पडले.सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख
यांच्यासह निवडक सैनिक होते.इकडे थोड्यावेळाने त्या शिवाजीचे सोंग
उघडकीश आले,तेव्हा सिद्दीने संतापून त्याला तात्काळ ठार केले.
शिवरायांसाठी,स्वराज्यासाठी या शिवाजीने आत्मबलिदान केले.तो अमर
झाला.
शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्दी
चवताळून गेला. त्याने तातडीने सिद्दीला मसऊद या आपल्या सरदाराला
मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले. पाठलाग चालू
झाला.दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर
गाठले.शिवराय पेचात पडले.त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडून
बाजीप्रभूचा बाणेदारपणा : चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने
खिंडीकडे दौडत येत होते. शिवरायांना वाटले , आता विशाळगड गाठणे
कठीण . ते बाजीप्रभूला म्हणाले , “ बाजी वेळ आणीबाणीची आहे.
पुढील वाट चढणीची . मागे शत्रू पाठीवर . आता विशाळगड हाती लागत
नाही. चला, शत्रूला उलटून तोंड देऊया !”शिवारायांच्या मनातील
घालमेल बाजीप्रभूने ओळखली . खिंडीच्या रोखने शत्रू चवताळून येत
होता.शिवरायांचे जीवित धोक्यात होते.सारे स्वराज्य धोक्यात होते.
बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, “ महाराज , तुम्ही थोडे
सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला . उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत
उभा राहतो. महाराज , मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. एक
बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण देशाला शिवाजी महाराजांची
गरज आहे . गानिमांची संख्या अफाट आहे. आपण थोडे आहोत. येथे
आपला निभाव लागणार नाही . तुम्ही येथे थांबू नका . आम्ही खिंड रोखून
धरतो. गनिमाला आम्ही येथेच थोपवून धरू . तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत
आम्ही येथे शत्रूला अडवून धरू . तुम्ही निर्धास्तपणे जा .” बाजीप्रभूची
स्वामिभक्ती बघून शिवराय गहिवरले . बाजीसारखा मोहरा इरेला घालणे
त्यांच्या जीवावर आले होते, पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते.
त्यांनी मन आवरले. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले. व म्हणाले , “ आम्ही
गडावर जातो . तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील ; मग ताबडतोड
खिंड सोडून तुम्ही निघून या .”
बाजी शत्रूला रोखले : बाजीप्रभूला खिंडीत मांगे ठेवून शिवराय
विशाळगडाकडे निघाले. बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लवून
मुजरा केला. मग त्याने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो
खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला .त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या.
त्यांनी जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगड गोटे जमा केले. आणि ते
आपापल्या जागी तयारीने उभे राहिले . खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची
पोलादी फळी तयार झाली. इतक्यात शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू आल्या.
शत्रू खिंडीखाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला , “ बहादूर
मर्दानो हुशार! जीव गेला तरी जागा सोडू नका. गनिमांना खिंड चढू
देऊ नका. “ बाजी आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून
उभे ठाकले. खिंडीतील वाट बिकट व नागमोडी होती. एका वेळी तीन-
चार मानसे कशीबशी वर चढू शकत.
तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते.
विशाळगडाचा पायथा अजून दूर होता. गडावर पोहोचण्यासाठी
शिवरायांना दीड –दोन तास हवे होते. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून
ठेवल्यास शिवरायंचे काम फत्ते होणार होते.
खिंडीतील झुंज : इकडे खिंडीत शर्थीची झुंज सुरु झाली. शत्रू
खिंड चढू लागला. शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली.
मावळ्यांची शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरु केला. दगड्धोंड्यांचा मारा
करण्यात मावळे पटाईत . त्यांनी सराईतपणाने हाणामारी सुरु केली.
शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना टिपले. कित्येकांची डोकी
फुटली. पहिली तुकडी नामोहरम झाली. मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी
नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला , हाणा , मारा,”
मावळ्यांना स्फुरण चढले . हर हर महादेव ‘ अशी गर्जना करत ते शत्रूवर
तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरु झाला. शत्रू धडाधड कोसळू
लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला, शाब्बास माझ्या पाठ्यांनो !
फेका आणखी दगड . ठेचा गनिमांना . होऊ द्या जोराचा मारा! शाब्बास
तुमची “ दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला.
तिकडे शिवराय विशाळगडाचे घोडदौड करत होते.गडाचा पायथा
जवळ येत होता. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. विशाळगडाच्या
पायथ्याशीही शत्रूचा वेढा होता. शिवरायांनी आपल्या निवडक
साथीदारांसह शत्रूच्या मोर्च्यावर हल्ला चढवला.शत्रूबरोबर झुंज देत .
शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून
विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते.
बाजीचा पराक्रम : इकडे घोंडखिंडीत शर्थीची झुंज अजून चालू
होती. सिद्दी मसूउद चिडला होता. त्याची तिसरी तुकडी खिंड चढू
लागली.मराठ्यांनी शौर्याची शर्थ केली. शत्रूने बाजीप्रभवर हल्ला
चढवला.बाजीला अंगावर अनेक वार झाले.जागोजागी जखमा झाल्या
अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या . तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले
नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला, पण तो मागे हाटला
नाही. मध्येच त्याने ओरडून मावळ्यांना सूचना दिली. मावळ्यांनी शत्रूवर
निकराचा झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष
तोफांच्या आवाजाकडे होते.
ती पावनखिंड : एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला.तोफांचे
आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले. “ महाराज
गडावर पोहचले.मी माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मारतो,”
असे म्हणून त्या स्वामीभक्त बाजीनेप्रभूने प्राण सोडला. ही वार्ता
विशाळगडावर महाराजांना समजली,तेव्हा त्यांना मोठे दु:ख झाले आणि
ते म्हणाले, “ बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले.
बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्थ केली !”
बाजीप्रभूसारखे देशभक्त होते, म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले.
त्या स्वमिनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. ‘ पावनखिंड’ या
नावानेच इतिहासात ती अमर झाली.धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो
बाजीप्रभू !

No comments:

Post a Comment