शायिस्ताखानाची स्वारी : विजापूरच्या आदिलशाहने जंगजंग
पछाडले,पण शिवारायांपुढे त्यांचे काही चालले नाही .त्यांच्या प्रत्येक
सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला.शेवटी आदिलशाहा नरम
झाला.त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य
केले.यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली.
मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले.मुघांच्या स्वाऱ्यांनी
महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती.त्या वेळी दिल्लीला औरंगजेब हा
मुघल बादशाहा होता.त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या.
त्यामुळे बादशाहा चिडला.त्याने आपला मामा शायिस्ताखान याला
शिवरायांवर पाठवले . तो पुण्यावर चालून आला.त्यांच्याबरोबर पाऊण
लाख सैन्य होते.शेकडो हत्ती,उंट आणि तोफा होत्या.शिरवळ ,
शिवापूर ,सासवड अशी गावे घेत घेत शायिस्ताखान आला.त्याने पुरंदर
किल्ल्याला वेढा दिला.तो पुढेपुढेच येत होता,पण एकदा मात्र
डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ,
भीमथडी ताटावर बसणारे ! चटणी- भाकरी खावी,अंगावर घोंगडी
टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यांतून धावपळ करावी, यांत
मराठे फार पटाईत . मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शायिस्ताखानाचे सैन्य
हैराण झाले.कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला.
फिरंगोजी नरसाळा : मग शायिस्ताखान पुण्याकडे वळला.प्रथम
त्याने चाकणचा किल्ला घेतला.चाकणच्या किल्लात फिरंगोजी
नरसाळयाने मोठ्या मर्दुमकीने शायिस्ताखानाशी मुकाबला केला.दोन
महिने फिरंगोजीने किल्ला लढवला,पण शायिस्ताखानाच्या तोफखान्यापुढे
त्याचा टिकाव लागला नाही.फिरंगोजी नरसाळयाच्या शौर्यावर
शायिस्ताखान खुश झाला. त्याने त्याला बादशाही चाकारीचे आमिष
दाखवले,पण फिरंगोजी बदलला नाही.
लाल महालात शायिस्ताखान : शायिस्ताखान पुण्यात आला.
त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला.त्याच्या फौजेने
लाल महालाभोवती तळ दिला.एक वर्ष गेले,दुसरे गेले,पण खान
काही लाल महालातून हलेना. उलट तो अधूनमधून आपली फौज
भोवतालच्या मुलाखत पाठवी . रयतेचे गुरे ओढून आणि ,शेतीची
नासधूस करी. अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालच्या मुलूख उद्धवस्त
केला.
धाडसी बेत : शायिस्ताखानाची खोड मोडायाचीच ,असे
शिवरायांनी ठरवले,खान लाल महाल बळकावून बसला होता,हे एका
दृष्टीने शिवरायांना सोईचेच होते, कारण त्या वाड्यातील खोल्या ,दालने,
खिडक्या,दारे,वाटा,चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती
होती.शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच
खुद्द शायिस्ताखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला
उडवावे,असा शिवरायांनी बेत केला.किती धाडसी बेत होता हा !
महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता. लाल महालाभोवती पाऊण
लाख फौजेचा खडा पहारा होता. हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला
शायिस्ताखानाने मनाई केली होती, पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला
म्हणजे झाला.
शिवरायांनी दिवस निश्चित केला.तारीख ५ एप्रिल १६६३ ची रात्र
वाजतगाजत लग्नाची वरात चालली होती. पुढे चंद्रज्योती जळत होत्या.
शेकडो स्त्री-पुरुष नटूनथटून चालले होते. कोणी पालख्यांत, कोणी
मेण्यांत , तर कोणी पायी. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत
शिरले होते. वरात पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम झाली. शिवराय
आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली . या वेळी
शायिस्ताखान गाढ झोपला होता.
शायिस्ताखानची खोड मोडली : वाड्याच्या भिंतीला भगदाड
पाडून शिवराय आत शिरले.त्यांचा स्वत:चाच वाडा तो ! त्यांना त्याचा
कानाकोपरा माहित होता.खानाचे पहारेकरी पेंगत होते.शिवरायांच्या
माणसांनी त्यांना बांधून टाकले.शिवराय आणखी आत शिरले .इतक्यात
कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला.शिवरायांनी त्याला ठार
केले.त्यांना वाटले शायिस्ताखान असावा,पण तो त्याचा मुलगा होता.
गडबड झाली.लोक जागे झाले.
शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले.त्यांनी समशेर
उपसली.शायिस्ताखान घाबरला.सैतान ! सैतान! म्हणून ओरडत
खिडकीवाटे पळू लागला.शिवराय त्याच्या मागोमाग धावले.
शायिस्ताखान खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार तोच शिवरायांनी
त्याच्यावर वार केला.खानाची तीन बोटे कापली गेली.प्राणावर आले
ते बोटांवर निभावले.खान खिडकीतून उडी टाकून पळाला.शिवाजी
आला,धावा,धावा! पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी
म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली.खानाची
माणसेही घाबरून पळत होती.शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे
निघून गेली.खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली.
शायिस्ताखानाने तर हाय खाल्ली . आज बोटे तुटली ,उद्या
आपले शीर शिवाजी कापून नेईल’ अशी भीती त्याला वाटू लागली.
औरंगजेब बदाशाहाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला.
तो शायिस्ताखानावर नाराज झाला.त्याने फर्मान काढून खानाची रवानगी
बंगालमध्ये केली.
मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता.
शिवराय फत्ते होऊन आले.तोफा उडाल्या .साऱ्या महाराष्ट्रात
आनंदी आनंद झाला.
पछाडले,पण शिवारायांपुढे त्यांचे काही चालले नाही .त्यांच्या प्रत्येक
सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला.शेवटी आदिलशाहा नरम
झाला.त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य
केले.यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली.
मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले.मुघांच्या स्वाऱ्यांनी
महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती.त्या वेळी दिल्लीला औरंगजेब हा
मुघल बादशाहा होता.त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या.
त्यामुळे बादशाहा चिडला.त्याने आपला मामा शायिस्ताखान याला
शिवरायांवर पाठवले . तो पुण्यावर चालून आला.त्यांच्याबरोबर पाऊण
लाख सैन्य होते.शेकडो हत्ती,उंट आणि तोफा होत्या.शिरवळ ,
शिवापूर ,सासवड अशी गावे घेत घेत शायिस्ताखान आला.त्याने पुरंदर
किल्ल्याला वेढा दिला.तो पुढेपुढेच येत होता,पण एकदा मात्र
डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ,
भीमथडी ताटावर बसणारे ! चटणी- भाकरी खावी,अंगावर घोंगडी
टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यांतून धावपळ करावी, यांत
मराठे फार पटाईत . मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शायिस्ताखानाचे सैन्य
हैराण झाले.कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला.
फिरंगोजी नरसाळा : मग शायिस्ताखान पुण्याकडे वळला.प्रथम
त्याने चाकणचा किल्ला घेतला.चाकणच्या किल्लात फिरंगोजी
नरसाळयाने मोठ्या मर्दुमकीने शायिस्ताखानाशी मुकाबला केला.दोन
महिने फिरंगोजीने किल्ला लढवला,पण शायिस्ताखानाच्या तोफखान्यापुढे
त्याचा टिकाव लागला नाही.फिरंगोजी नरसाळयाच्या शौर्यावर
शायिस्ताखान खुश झाला. त्याने त्याला बादशाही चाकारीचे आमिष
दाखवले,पण फिरंगोजी बदलला नाही.
लाल महालात शायिस्ताखान : शायिस्ताखान पुण्यात आला.
त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला.त्याच्या फौजेने
लाल महालाभोवती तळ दिला.एक वर्ष गेले,दुसरे गेले,पण खान
काही लाल महालातून हलेना. उलट तो अधूनमधून आपली फौज
भोवतालच्या मुलाखत पाठवी . रयतेचे गुरे ओढून आणि ,शेतीची
नासधूस करी. अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालच्या मुलूख उद्धवस्त
केला.
धाडसी बेत : शायिस्ताखानाची खोड मोडायाचीच ,असे
शिवरायांनी ठरवले,खान लाल महाल बळकावून बसला होता,हे एका
दृष्टीने शिवरायांना सोईचेच होते, कारण त्या वाड्यातील खोल्या ,दालने,
खिडक्या,दारे,वाटा,चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती
होती.शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच
खुद्द शायिस्ताखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला
उडवावे,असा शिवरायांनी बेत केला.किती धाडसी बेत होता हा !
महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता. लाल महालाभोवती पाऊण
लाख फौजेचा खडा पहारा होता. हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला
शायिस्ताखानाने मनाई केली होती, पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला
म्हणजे झाला.
शिवरायांनी दिवस निश्चित केला.तारीख ५ एप्रिल १६६३ ची रात्र
वाजतगाजत लग्नाची वरात चालली होती. पुढे चंद्रज्योती जळत होत्या.
शेकडो स्त्री-पुरुष नटूनथटून चालले होते. कोणी पालख्यांत, कोणी
मेण्यांत , तर कोणी पायी. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत
शिरले होते. वरात पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम झाली. शिवराय
आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली . या वेळी
शायिस्ताखान गाढ झोपला होता.
शायिस्ताखानची खोड मोडली : वाड्याच्या भिंतीला भगदाड
पाडून शिवराय आत शिरले.त्यांचा स्वत:चाच वाडा तो ! त्यांना त्याचा
कानाकोपरा माहित होता.खानाचे पहारेकरी पेंगत होते.शिवरायांच्या
माणसांनी त्यांना बांधून टाकले.शिवराय आणखी आत शिरले .इतक्यात
कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला.शिवरायांनी त्याला ठार
केले.त्यांना वाटले शायिस्ताखान असावा,पण तो त्याचा मुलगा होता.
गडबड झाली.लोक जागे झाले.
शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले.त्यांनी समशेर
उपसली.शायिस्ताखान घाबरला.सैतान ! सैतान! म्हणून ओरडत
खिडकीवाटे पळू लागला.शिवराय त्याच्या मागोमाग धावले.
शायिस्ताखान खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार तोच शिवरायांनी
त्याच्यावर वार केला.खानाची तीन बोटे कापली गेली.प्राणावर आले
ते बोटांवर निभावले.खान खिडकीतून उडी टाकून पळाला.शिवाजी
आला,धावा,धावा! पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी
म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली.खानाची
माणसेही घाबरून पळत होती.शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे
निघून गेली.खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली.
शायिस्ताखानाने तर हाय खाल्ली . आज बोटे तुटली ,उद्या
आपले शीर शिवाजी कापून नेईल’ अशी भीती त्याला वाटू लागली.
औरंगजेब बदाशाहाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला.
तो शायिस्ताखानावर नाराज झाला.त्याने फर्मान काढून खानाची रवानगी
बंगालमध्ये केली.
मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता.
शिवराय फत्ते होऊन आले.तोफा उडाल्या .साऱ्या महाराष्ट्रात
आनंदी आनंद झाला.
No comments:
Post a Comment